Raigad Fort Information In Marathi | रायगड किल्ल्याची माहिती मराठीत 2025.

Raigad Fort Information In Marathi.

रायगड किल्ला.

    किल्ले रायगड हा महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगेत आहे. रायगड किल्ला हा चहुबाजूंनी डोंगरांनी वेढलेला आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे ८२० मीटर (२७०० फूट) उंचीवर आहे. रायगडाच्या उत्तरेला आणि पूर्वेला काळ नदीचे खोरे पसरलेले आहे, तर पश्चिमेला गांधारी नदी वाहाते. याच्या पूर्वेला लिंगाणा, आग्नेयेला राजगड, तोरणा; दक्षिणेकडे मकरंदगड, प्रतापगड, वासोटा, उत्तरेला कोकणदिवा असा मुलूख दिसतो. मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्याची एक खास ओळख आहे.

छत्रपती शिवाजीराजांनी रायगडचे स्थान आणि महत्त्व पाहून १६ व्या शतकात रायगड किल्ल्याला आपल्या राज्याची राजधानी बनविली. शत्रूला अवघड वाटणार्‍या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे. सागरी दळणवळणासही हे ठिकाण जवळ आहे म्हणून महारांजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली.  महाराजांचा शिवराज्याभिषेक याच ठिकाणी झाला. इंग्रजांनी गड कब्जात घेतल्यानंतर लुटून त्याची नासधूस केली. सदर किल्ला हा महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाचे संरक्षित स्मारक आहे. Raigad Fort Information In Marathi.

Raigad Fort Information In Marathi.

रायगड किल्ल्याचा इतिहास :

       रायगडाचे प्राचीन नाव ‘रायरी’ हे होते. युरोपचे लोक त्यास ‘पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे म्हणत असत. जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य तितकाच रायगड अजिंक्य व दुर्गम होता. पाचशे वर्षांपूर्वी त्यास गडाचे स्वरूप नव्हते व तो नुसता एक डोंगर होता, तेव्हा त्यास ‘रासिवटा’ व ‘तणस’ अशी दोन नावे होती. त्याचा आकार, उंची व सभोवतालच्या दऱ्या यावरून त्यास ‘नंदादीप’ असेही नाव पडले. निजामशाहीत रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता केला जात असे. मोऱ्यांचा प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिला तर प्रतापराव मोरे विजापुरास पळाला.

महाराजांनी ६ एप्रिल १६५६ रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आली. तेथे असताना, कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद हा खजिना घेऊन विजापूरकडे निघाल्याची बातमी महाराजांना समजली. त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला व त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला. रायगडाचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा व पुरेसा आहे. शत्रूला अवघड वाटणाऱ्या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे. सागरी दळणवळणासही हे ठिकाण जवळ आहे. म्हणून महाराजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली. रायगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव जम्बुदीप असे होते.Raigad Fort Information In Marathi.

महाराजांच्या पहिल्या रायगड भेटीचे वर्णन करतांना सभासद बखर म्हणते –

          “राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोटा. चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे दिड गांव उंच. पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतु तो उंचीने थोडका. दौलताबादचे दशगुणी गड उंच असे देखोन बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले, तक्तास जागा हाच गड करावा.”Raigad Fort Information In Marathi.

    हे बघून महाराज खुशीने म्हणाले… ‘तख्तास जागा हाच गड करावा’. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शब्दाचा उल्लेख बखरीत आहे. रायगडाचे स्थान लक्षात घेऊन या किल्यावरच राजधानी बसवण्याचे छत्रपती शिवाजी महाराजांनी निश्चित केले. रायगडाचे जुने नाव रायरी, गडाचा विस्तार प्रचंड असून समुद्रसपाटीपासून किल्याची उंची २७०० फूट आहे. गडाला सुमारे १४३५ पायऱ्या आहेत. गडाच्या पश्चिमेकडे हिरकणीचा बुरूज, उत्तरेकडच टकमक टोक, श्री शिरकाई मंदिर आणि मध्यभागी असलेला महाराजांचा पुतळा हे मुख्य आकर्षण आहे.Raigad Fort Information In Marathi.

शिर्के पाचव्या शतकापासून रायगडाचे स्वामी होते. याची आठवण देणारी गडस्वमिनी श्री शिरकाई मंदिर गडावर आहे. लोकमान्य टिळकांच्या काळात मावळंकर नावाच्या इंजिनिअरने हे मंदिर बांधले आहे. ते श्री शिरकाईचे मूळ मंदिर नाही. मूर्ती मात्र प्राचीन आहे. मूळ शिरकाई मंदिर राजवाड्यास लागून डावीकडे होळी माळावर होते. तेथे मूळ देवळाचा चबुतरा अजूनही आहे. ब्रिटिश काळापासून तेथे श्री शिरकाईचा घरटा हा नामफलक होता.Raigad Fort Information In Marathi.

याच दुर्गदुर्गेश्वराला १५ विविध नावांनी संबोधिले गेले आहे ते पुढील प्रमाणे :-

१) रायगड , २) रायरी, ३) इस्लामगड,

४) नंदादीप, ५) जंबुद्विप, ६) तणस,

७) राशिवटा, ८) बदेनूर, ९) रायगिरी,

१०) राजगिरी, ११)भिवगड, १२) रेड्डी,

१३) शिवलंका, १४) राहीर, १५) पूर्वेकडील जिब्राल्टर.

शिवराज्याभिषेक

   शिवराज्याभिषेक हा रायगडाने अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग आहे. महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे, महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक लक्षणीय घटना आहे. १९ मे १६७४ रोजी राज्याभिषेकाच्या विधी पूर्वी महाराजांनी प्रतापगडाच्या भवानीचे दर्शन घेतले. तीन मण सोन्याचे म्हणजेच ५६ हजार किंमतीचे छत्र देवीला अर्पण केले. गडावरील राजसभेत दिनांक ६ जून १६७४, ज्येष्ठ शुद्ध १३ शके १५९६, शनिवार या दिवशी राज्याभिषेक साजरा झाला. २४ सप्टेंबर १६७४, ललिता पंचमी आश्विन शुद्ध ५, आनंद संवत्सर शके १५९६ या दिवशी तांत्रिक पद्धतीने राजांनी स्वतःला आणखी एक राज्याभिषेक करून घेतला. या मागचा खरा हेतू हा जास्तीत जास्त लोकांना समाधान वाटावे हा होता. हा राज्याभिषेक निश्चलपुरी गोसावी याच्या हस्ते पार पडला. Raigad Fort Information In Marathi.

कवी भूषण रायगडाचे वर्णन करतो की –

       “छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व किल्ल्यांचा आधार व विलासस्थान अशा रायगड किल्ल्यास आपले वसतीस्थान केले. हा किल्ला एवढा प्रचंड आणि विशाल आहे की, त्यात तीनही लोकीचे वैभव साठवले आहे. गडावर विहिरी, सरोवरे, कूप विराजत आहेत. सर्व यवनांना जिंकून रायगडावर राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी राजधानी केली आणि लोकांचे इच्छित पुरवून जगतात श्रेष्ठ यश संपादन केले.’

       इ.स. १६७५ फेब्रुवारी ४, शके १५९६ आनंद संवत्सर माघ व. ५ गुरूवार या दिवशी संभाजी राजांची मुंज रायगडावर झाली. शके १६०१ सिद्धार्थी संवत्सर फाल्गुन व. २, १६८० मार्च ७ या दिवशी राजाराम महाराजांची मुंज रायगडावर झाली. लगेच आठ दिवसांनी राजाराम महाराजांचे लग्न प्रतापराव गुजर यांच्या मुलीशी झाले.

      रायगडाने अनुभवलेला अत्यंत दुःखद प्रसंग म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन. शके १६०२ रुद्रनाम संवत्सरे चैत्र शुद्ध पौर्णिमा, हनुमान जयंती, दि. ३ एप्रिल १६८० या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाले. सभासद बखर म्हणते, ‘ते दिवशी पृथ्वीकंप जाहला. अष्टदिशा दिग्दाह होऊन गेल्या. श्रीशंभुमहादेवी तळ्याचे उदक रक्तांबर जाले.’ Raigad Fort Information In Marathi.

      पुढे शके १६०२ रौद्र संवत्सर माघ शु. ७, इ.स. १६८१ १६ फेब्रुवारी या दिवशी रायगडावर संभाजी महारांजाचे विधिपूर्वक राज्यारोहण झाले.

      इ.स. १६८४ च्या सप्टेंबरमध्ये औरंगजेबाने रायगडच्या मोहिमेस सुरुवात केली. शहाबुद्दीन खान यास चाळीस हजार सैन्यासह बादशहाने रायगडाच्या पायथ्याशी धाडले. १५ जानेवारी १६८५ च्या सुमारास शहाबुद्दीने गडाच्या पायथ्याशी असलेल्या एका गावाला आग लावली व लुटालूट चालू केली. पण प्रत्यक्ष रायगडावर हल्ला न करता तो १६८५ च्या मार्चमध्ये परतला.

     औरंगजेबाने आपला वजीर आसदखान याचा मुलगा इतिकादखान उर्फ झुल्फिकारखान यास सैन्य देऊन रायगड घेण्यास पाठवले. शके १६१० विभव संवत्सर फाल्गुन शु. ३, १२ फेब्रुवारी १६८९ रोजी राजाराम महाराजांची कारकीर्द सुरू झाली आणि २५ मार्च १६८९ रोजी खानाने गडास वेढा घातला. दि. ५ एप्रिल १६८९ रोजी राजाराम महाराज रायगडावरून निसटून प्रतापगडावर गेले. पुढे जवळजवळ आठ महिने वेढा चालू होता. पण दि. ३ नोव्हेंबर १६८९ रोजी सूर्याजी पिसाळ या किल्लेदाराच्या फितुरीमुळे किल्ला मोगलांना मिळाला. वाईची देशमुखी देण्याचे आमिष दाखवून खानाने त्यास फितुर केले.

      झुल्फिकारखान हा बादशाहने इतिकादखानला दिलेला किताब आहे. पुढे रायगडचे नामांतर ‘इस्लामगड’ असे झाले. ५ जून १७३३ या दिवशी शाहूमहाराजांच्या कारकीर्दीत मराठ्यांनी पुन्हा रायगड घेतला. Raigad Fort Information In Marathi.

रायगडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :

१. पाचाडचा जिजाबाईंचा वाडा : पाचाडचा जिजाबाईंचा वाडा रायगडाच्या पायथ्याशी आहे. उतारवयात जिजाबाईंना गडावरची थंड हवा, वारा मानवत नसे, म्हणून महाराजांनी त्यांचासाठी पाचाडजवळच एक वाडा बांधून दिला. तोच हा मासाहेबांचा राहता वाडा. वाड्याची व्यवस्था ठेवण्यासाठी काही अधिकारी तसेच शिपायांची व्यवस्थाही महाराजांनी केली होती. पायऱ्यांची एक उत्तम विहीर, तसेच जिजाबाईंना बसण्यासाठी केलेले दगडी आसन बघण्यासारखे आहे. यास ‘तक्क्याची विहीर’ असेही म्हणतात.

२. राजमाता जिजाबाईंची समाधी – राजमाता जिजाऊ यांची समाधी रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी पाचाड या गावी आहे. पाचाडच्या  वाड्यापासून काही अंतरावर ही  समाधी आहे.

३. खुबलढा बुरूज : गड चढू लागले म्हणजे एक बुरुजाचे ठिकाण दिसते, तोच हा सुप्रसिद्ध खुबलढा बुरूज. बुरुजा शेजारी एक दरवाजा होता, त्यास ‘चित्‌ दरवाजा’ म्हणत पण हा दरवाजा आता पूर्णपणे उध्वस्त झ़ाला आहे.

४. नाना दरवाजा : या दरवाजास ‘नाणे दरवाजा’ असेही म्हणत. नाना दरवाजा याचाच अर्थ लहान दरवाजा. इ.स. १६७४ च्या मे महिन्यात राज्याभिषेकाचा निमित्ताने इंग्रजांचा वकील हेन्‍री ऑक्झेंडन याच दरवाजाने आला होता. या दरवाजास दोन कमानी आहेत. दरवाजाचा आतील बाजूस पहारेकऱ्यांसाठी दोन लहान खोल्या आहेत. त्यांस ‘देवडा’ म्हणतात. दरवाजास अडसर घालण्यासाठी खोबणी दिसतात.

५. मदारमोर्चा किंवा मशीदमोर्चा :  चित्‌ दरवाजाने गेल्यावर नागमोडी वळणे घेत गेलेल्या रस्त्याने पुढे गेल्यावर एक सपाटी लागते. या मोकळ्या जागेत टोकाशी दोन पडक्या इमारती दिसतात. त्यापैकी एक पहारेकऱ्यांची जागा असून दुसरे धान्याचे कोठार आहे. येथे मदनशहा नावाचा साधूचे थडगे आहे. तेथे एक प्रचंड तोफही दिसते. येथून पुढे गेल्यावर खडकात खोदलेल्या तीन गुहा दिसतात.

६. महादरवाजा : महादरवाजाचा बाहेरील अंगास वर दोन्ही बाजूस दोन सुंदर कमळाकृती कोरल्या आहेत दरवाजावर असणाऱ्या या दोन कमळांचा अर्थं म्हणजे किल्ल्याचा आत ‘श्री आणि सरस्वती’ नांदत आहे. ‘श्री आणि सरस्वती’ म्हणजेच ‘विद्या व लक्ष्मी’ होय. महादरवाजाला दोन भव्य बुरूज असून एक ७५ फूट तर दुसरा ६५ फूट उंचं आहे. तटबंदीमध्ये जी उतरती भोके ठेवलेली असतात त्यास ‘जंग्या’ म्हणतात. शत्रूवर मारा करण्यासाठी ही भोके ठेवलेली असतात. बुरुजांमधील दरवाजा हा वायव्य दिशेस तोंड करून उभा आहे. महादरवाजातून आत आल्यावर पहारेकऱ्यांचा देवड्या दिसतात तसेच संरक्षकांसाठी केलेल्या राहण्याचा खोल्या दिसतात. महादरवाजापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत तर डावीकडे हिरकणी टोकापर्यंत तटबंदी बांधलेली आहे. Raigad Fort Information In Marathi.

७. चोरदिंडी : महादरवाजापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत जी तटबंदी जाते, त्यावरून चालत गेल्यास जिथे ही तटबंदी संपते, त्याचा थोडे अलीकडे बुरुजात ही चोरदिंडी बांधलेली आहे. बुरुजाचा आतून दरवाजापर्यंत येण्यासाठी पायऱ्या आहेत.

८. हत्ती तलाव : महादरवाजातून थोडे पुढे आल्यावर जो तलाव दिसतो तो हत्ती तलाव. गजशाळेतून येणाऱ्या हत्तींच्या स्नानासाठी आणि पिण्यासाठी या तलावाचा उपयोग होत होता.

९. हनुमान टाकी : महादरवाजा पासून काही पायऱ्या चढून वरती आल्यावर आपल्याला डाव्या बाजूस हनुमान टाकी आहे

१०. शिरकाई देऊळ :  महाराजांचा पुतळ्याचा डाव्या बाजूस जे छोटे देऊळ दिसते ते शिरकाईचे देऊळ. शिरकाई ही गडावरील मुख्य देवता. शिर्के पाचव्या शतकापासून रायगडाचे स्वामी होते. याची आठवण देणारी गडस्वमिनी शिरकाई हिचे मंदिर गडावर आहे. लोकमान्य टिळकांचा काळात मावळकर नावाचा इंजिनिअराने हे मंदिर बांधले आहे. ते शिरकाईचे मूळ मंदिर नाही. मूर्ती मात्र प्राचीन आहे. मूळ शिरकाई मंदिर राजवाड्यास लागून डावीकडे होळी माळावर होते. तेथे मूळ देवळाचा चबुतरा अजूनही आहे. ब्रिटिश काळात तेथे शिरकाईचा घरटा हा नामफलक होता.

११. हत्ती खाना : हत्ती खाना मध्ये त्यावेळेचे गडावरील असलेले हत्ती ठेवण्यात येत असत , परंतु आता त्याचे रूपांतर  Archeological Office मध्ये झाले आहे.

१२. होळी माळ : हत्ती खान्या समोरच होळीचा  माळ आहे , त्या काळी होळी खेळण्यासाठी याचा वापर होत असे . होळी पेटली  कि महाराज येऊन त्यामध्ये नारळ  टाकत असे आणि त्यांच्या प्रजेच्या  सुखाची आणि आनंदाची प्राथर्ना करत असत . एक अट असायची त्यावेळी महाराजांची जो कोनी महाराजांनी टाकलेला  आगेतील जळता नारळ काढेल त्याला महाराजांच्या हातातील सव्वा किलो सोन्याचे कडे बक्षीस म्हणून देण्यात येईल, फक्त शिवपुत्र संभाजी राजे यांनाच हा पराक्रम करता आला होता.

१३.  कुशावर्त तलाव : होळीचा माळ डाव्या हातास सोडून उजवीकडील वाट कुशावर्त तलावाकडे जाते. तलावाजवळ महादेवाचे छोटेसे देऊळ दिसते. देवळासमोर फुटलेल्या अवस्थेतला नंदी दिसतो.

१४.  वाघदरवाजा : कुशावर्त तलावाजवळून घळीने उतरत वाघ दरवाजाकडे जाता येते. आज्ञापत्रात लिहिले आहे की, ‘किल्ल्यास एक दरवाजा थोर आयब आहे, यांकरीता गड पाहून एक दोन – तीन दरवाजे, तशाच चोरदिंडा करून ठेवाव्या. त्यामध्ये हमेशा राबत्यास पाहिजे तितक्या ठेवून वरकड दरवाजे व दिंडा चिणून टाकाव्या.’ हे दूरदर्शीपणाचे धोरण ठेवूनच महाराजांनी महादरवाजाशिवाय हा दरवाजा बांधून घेतला. या दरवाजाने वर येणे जवळजवळ अशक्यच असले तरी दोर लावून खाली उतरू शकतो. पुढे राजाराम महाराज व त्यांची मंडळी झुल्फिरखानाचा वेढा फोडून याच दरवाजाने निसटली होती. Raigad Fort Information In Marathi.

१५. बारा टाकी : इथे आल्यावर आपल्याला वेगवेगळ्या आकाराच्या टाक्या पाहायला मिळतात.

१६.  नगारखाना : सिंहासनाचा समोर जे भव्य प्रवेशद्वार दिसते तोच हा नगारखाना. हे बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. नगारखान्यातून पायऱ्या चढून वर गेले की माणूस किल्ल्यावरील सर्वाधिक उंचीवर असतो.

१७. राजसभा : महाराजांचा राज्याभिषेक जेथे झ़ाला, तीच ही राजसभा. राजसभा २२० फूट लांब व १२४ फूट रुंद आहे. येथेच पूर्वेकडे तोंड केलेली सिंहासनाची जागा आहे. येथे बत्तीस मणांचे सोन्याचे सिंहासन होते. सभासद बखर म्हणते, ‘तख्त सुवर्णाचे बत्तीस मणांचे सिद्ध करवले. नवरत्‍ने अमोलिक जितकी कोशात होती, त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्‍ने जडाव केली.’

१८. राजभवन : राणीवशाचा समोर डाव्या हातास दासदासींचा मकानांचे अवशेष दिसतात. या अवशेषांचा मागे दुसरी जी समांतर भिंत आहे त्या भिंतीचा मध्यभागी जो दरवाजा आहे तेथून बालेकिल्ल्याचा अंतर्भागात प्रवेश केला की जो प्रशस्त चौथरा लागतो तेच हे महाराजांचे राजभवन. राजभवनाचा चौथारा ८६ फूट लांब व ३३ फूट रुंद आहे.

१९. टेहळणी बुरुज : २१ खिडक्या आहेत या बुरुजाच्या , या बुरुजाचा वापर छत्रपती शिवाजी महाराज त्यावेळेस शत्रू वर नजर ठेवण्या साठी करत असे.

२०. गंगासागर तलाव : हत्तीतलावापासून जवळच रायगड जिल्हा परिषदेचा धर्मशाळेचा इमारती दिसतात. धर्मशाळेपासून दक्षिणेकडे अंदाजे ५० -६० पावले चालत गेल्यास जो तलाव लागतो तो गंगासागर तलाव. महाराजांचा राज्याभिषेकानंतर सप्तसागर व महानांची आणलेली तीर्थे याच तलावात टाकली गेली. म्हणूनच याचे गंगीसागर असे नाव पडले. शिवाजी महाराजांचा काळात शिबंदीसाठी याचे पाणी वापरण्यात येई. Raigad Fort Information In Marathi.

२१. खलबत खाना : शिवाजी महाराजांची गुप्त चर्चा करण्याची ही जागा , ही वरून 10*15 ची खोली दिसत असली तरी खरी जागा खाली आहे . काळोख असलेली खोली म्हणजेच खलबत खान होय.

२२. सचिवालय : इथे छत्रपती शिवाजी महाराजचा न्याय निवड चाले,  कोणाला युद्ध साठी पात्र पाठवायचे आसतील तरी सचिवालय चा वापर केला जाई.

२३. राजवाडा : सांगण्यात येते कि त्या वेळेस हा राजवाडा दोन माळ्यांचा होता, सुंदर नक्षीकाम, झाड , सागाच्या लाकडाचे खांब , फुलांनी सजवलेल्या भिंती अशी या राजमहालाचि ओळख होती. इथूनच बाजूकडील द्वारा कडून वर येताच  छत्रपती शिवाजी महाराजांची बालकानी पाहायला मिळते. Raigad Fort Information In Marathi.

२४. टाकसाळ : टाकसाळ म्हणजेच मुद्रा बनवण्याची वास्तू आहे. इथे सोन्याचे नाणी , राजमुद्रा , शिवराई बनवण्यात येत असत.

२५. राणी महाल : छत्रपती शिवाजी महाराजांना आठ राण्या होत्या. त्या पैकी सईबाई राजगडावर राहत आसत, तर सोयरा बाई  जिजाऊंच्या सेवे साठी पाचाड गावी असलेल्या त्यांच्या राजवाड्यात राहत असत.

२६. मेना दरवाजा : राणी महालाच्या बाजूलाच मेना दरवाजा आहे. त्या काळी कदाचित राण्यांना मेण्या मध्ये पासून याच दरवाज्याने आणले जात. म्हणून कदाचित या दरवाज्याला मेना दरवाजा म्हणले जात. आता मेना दरवाज्या मधून बाहेर येताच रोप-वे आहे. पालखी दरवाजाने वर प्रवेश केला की, चढउतार असलेला एक सरळ मार्ग आपल्याला मेणा दरवाजापर्यंत घेऊन जातो. उजव्या हातास जे सात अवशेष दिसतात ते आहेत राण्यांचे महाल. मेणा दरवाजातून बालेकिल्ल्यावर प्रवेश करता येतो. Raigad Fort Information In Marathi.

२७. हिरकणी बुरुज : गंगासागराचा उजवीकडे पश्चिमेस जी चिंचोळी वाट जाते ती हिरकणी बुरुजाकडे जाते. हिरकणी बुरुजाशी संबंधित हिरकणी गवळणीची एक कथा सांगितली जाते. या बुरुजावर काही तोफाही ठेवलेल्या दिसतात. बुरुजावर उभे राहिले तर डाव्या हाताला गांधारीचे खोरे, उजव्या बाजूला काळ नदीचे खोरे दिसते. तसेच इथून पाचाड, खुबलढा बुरूज, मशीद मोर्चा ही ठिकाणे तोफेचा माऱ्यात आहेत. त्यामुळे युद्धशास्त्राचा तसेच लढाऊ दृष्टीने ही खूप महत्त्वाची आणि मोक्याची जागा आहे. Raigad Fort Information In Marathi.

२८. धान्याचे कोठार : इथे तुम्हाला जाळी टाकलेली तीन टाक्यांच्या आकाराची वास्तू पाह्यला मिळेल , ती छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावरील धान्याचे कोठारे आहेत. कोठारांची क्षमता अवधी कि शत्रू पाच ते सहा महिने पण रायगडाला वेढा घालून राहिला तारी गडावरील असलेला, तीन ते चार हजार लोकांना पुरेल एवढा अन्ना साठा या गोदामात आसे.

२९. अष्टप्रधान वाडा : ३५० वर्षांन पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचे जे मंत्री मंडळ होते त्यांचे हे वाडे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० किल्ल्यांचा वेव्हार याच मंत्री मंडळातून होत आसे.

३०. पालखी दरवाजा : स्तंभांचा पश्चिमेस भिंत असलेल्या भागातून ३१ पायऱ्या बांधलेल्या दिसतात. त्या चढून गेल्यावर जो दरवाजा लागतो तो पालखी दरवाजा. या दरवाजातून बालेकिल्ल्यात प्रवेश करता येतो.

३१. बालेकिल्ला : शत्रूला कधीही न जिंकता येणार – किल्ल्यावर स्थित छोटा किल्ला म्हणजे बालेकिल्ला होय.  बालेकिल्ला हि  किल्ल्यावरची सगळ्यात सुरक्षित जागा असून युद्धाच्या प्रसंगी तशेच कठीण प्रसंगी त्या जागेचा उपयोग होत असे.

३२. मनोरा : टेहळणी बुरुजाच्या बाजूलाच आपल्याला हे दोन ढासळेल मनोरे पाहायला मिळते , जाणकारान कडून सांगण्यात येते त्या वेळी हे मनोरे पहिले पाच माळ्याचे होते. त्या वेळे या मनोरांचा वापर छत्रपती शिवाजी महाराजांनि कोणता नवीन किल्ला स्वराज्यात जिकून शामिल केला कि इथे भगवा झेंडा फडकवण्या साठी करायचे. मनोऱ्या वर भगवा झेंडा फडकला कि जवळपासच्या गावांना लक्ष्यात येई कि छत्रपती शिवाजी महाराजांनि नवीन गड जिकून स्वराज्यात सामील केला आहे. मनोरांच्या आत प्रवेश करताच खांब वर असलेल्या पणत्यांनसाठीच्या खिडक्या तशेच त्या वर असलेले हत्तीचे मुख दिसते. Raigad Fort Information In Marathi.

३३.  बाजारपेठ : नगारखान्याकडून डावीकडे उतरून आले की, समोर जी मोकळी जागा दिसते तो ‘होळीचा माळ’. तेथेच आता शिवछत्रपतींचा भव्य पुतळा बसवलेला आहे. पुतळ्यासमोर जे दोन रांगांमध्ये भव्य अवशेष दिसतात तीच शिवाजी महाराजांचा काळातील बाजारपेठ. पेठेचा दोन रांगात प्रत्येकी २२ दुकाने आहेत. दोन रांगांमधून जवळजवळ चाळीस फूट रुंदीचा रस्ता आहे.हे बाजार पेठ आजही हुबेहुब जसेचा तसेच आहे.

३४. टकमक टोक : बाजारपेठेचा समोरील टेपावरून खाली उतरून टकमक टोकाकडे जाता येते. तेथेच एका दारूचा कोठाराचे अवशेष दिसतात. जसजसे टोकाकडे जावे तसतसा रस्ता निमुळता होत जातो. उजव्या हाताला सरळ तुटलेला २६०० फूट खोल कडा आहे. टोकावर वारा प्रचंड असतो व जागाही कमी असल्यामुळे गोंधळ न करता सावधानता बाळगावी लागते. आधीपासुनच शिवराज्यकाळात या ठिकाणावरून गुन्हेगारांचा कडेलोट केला जाई.

जगदीश्वर मंदिराची पहिली पायरी, ज्यावर रायगडाचे वास्तुविशारद हिरोजी इंदुलकर यांचे नाव कोरलेले आहे

३५. जगदीश्वर मंदिर : बाजारपेठेचा खालचा बाजूस पूर्वेकडील उतारावर ब्राह्मणवस्ती, ब्राह्मणतळे वगैरे अवशेष दिसतात. तेथूनच समोर जे भव्य मंदिर दिसते तेच महादेवाचे म्हणजे जगदीश्वराचे मंदिर. मंदिरासमोर नंदीची भव्य आणि सुबक मूर्ती आहे. पण सध्या ही मूर्ती भग्रावस्थेत आहे. मंदिरात प्रवेश केला की भव्य सभामंडप लागतो. मंडपाच्या मध्यभागी भव्य कासव आहे. गाभाऱ्याचा भिंतीस हनुमंताची भव्य मूर्ती दिसते. मंदिराचा प्रवेशद्वाराचा पायऱ्यांचा खाली एक लहानसा शिलालेख दिसतो. तो पुढीलप्रमाणे, ‘सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इटळकर’ या दरवाजाचा उजव्या बाजूस भिंतीवर एक सुंदर शिलालेख दिसतो तो पुढीलप्रमाणे –

श्री गणपतये नमः। प्रासादो जगदीश्वरस्य जगतामानंददोनुज्ञया श्रीमच्छत्रपतेः शिवस्यनृपतेः सिंहासने तिष्ठतः। शाके षण्णवबाणभूमिगणनादानन्दसंवत्सरे ज्योतीराजमुहूर्तकिर्तीमहिते शुक्लेशसापै तिथौ ॥१॥ वापीकूपडागराजिरुचिरं रम्यं वनं वीतिकौ स्तभेः कुंभिगृहे नरेन्द्रसदनैरभ्रंलिहे मीहिते । श्रीमद्रायगिरौ गिरामविषये हीराजिना निर्मितो यावच्चन्द्रदिवाकरौ विलसतस्तावत्समुज्जृंभते ॥२॥ याचा थोडक्यात अर्थ पुढीलप्रमाणे -’सर्व जगाला आनंददायी असा हा जगदीश्वराचा प्रासाद श्रीमद् छत्रपती शिवाजी राजांचा आज्ञेने शके १५९६ मध्ये आनंदनाम संवत्सर चालू असताना सुमुहुर्तावर निर्माण केला. या रायगडावर हिरोजी नावाचा शिल्पकाराने विहिरी, तळी, बागा, रस्ते, स्तंभ, गजशाळा, राजगृहे अशांची उभारणी केली आहे. ती चंद्रसूर्य असेतोवर खुशाल नांदो.’ Raigad Fort Information In Marathi.

३६. महाराजांची समाधी : मंदिराचा पूर्वदरवाजापासून थोडा अंतरावर जो अष्टकोनी चौथरा दिसतो तीच महाराजांची समाधी. सभासद बखर म्हणते, ‘क्षत्रियकुलावतंस श्रीमन्महाराजाधिराज शिवाजी महाराज छत्रपती यांचा काल शके १६०२चैत्र (शुद्ध १५ (इसवी1680)या दिवशी रायगड येथे झ़ाला. देहाचे सार्थक त्याणी बांधिलेला जगदीश्वराचा जो प्रासाद त्याचा महाद्वाराचा बाहेर दक्षणभागी केले.

तेथे काळ्या दगडाचा चिऱ्याचे सुमारे छातीभर उंचीचे अष्टकोनी जोते बांधिले असून वरून फरसबंदी केलेली आहे. फरसबंदीचा खाली पोकळी आहे, तीत महाराजांचा अवशिष्टांश रक्षामिश्र मृत्तिकारूपाने सापडतो.’ दहनभूमी पलीकडे भग्‍न इमारतींचा अवशेषांची एक रांग आहे, ते शिबंदीचे निवासस्थान असावे. त्याचा पलीकडे सदर वस्तीपासून विलग असा एक घराचा चौथरा दिसतो. हे घर इ.स. १६७४ मध्ये इंग्रज वकील हेनरी ऑक्झेंडन यास राहावयास दिले होते. महाराजांचा समाधीचा पूर्वेकडे भवानी टोक आहे तर उजवीकडे दारूची कोठारे, बारा टाकी दिसतात. Raigad Fort Information In Marathi.

३७. वाघ्या कुत्र्याची समाधी : इतिहासात असे म्हटले जाते की शिवाजी महाराजांचा अत्यसंस्कार चालू होता तेव्हा शिवाजी महाराजांचा वाघ्या नावाचा कुत्र्याने त्या आगीत उडी घेतली.

३८. रायगडावरील अश्‍मयुगीन गुहा :

पुण्याहून रायगडापर्यंत जाण्यासाठी थेट बससेवा आहे. ही बस पुण्यातून भोरमार्गे वरंधा घाटातून महाडमार्गे पाचाड गावातून रायगडचा दोरवाटेचा (रोप वेचा) तळावरून पाचाड खिंडीत येते. येथून पायउतार होऊन अवघ्या १४३५ पायऱ्या चढून गेले, की रायगडमाथा गाठता येतो. पण या पाचाड खिंडीतच रायगडाचा विरुद्ध दिशेस अवघ्या ४-५ मिनिटांचा चढणीवर एक गुहा आहे. तिला म्हणतात “वाघबीळ’ किंवा “नाचणटेपाची गुहा.’ नवे ट्रेकर्स या गुहेला “गन्स ऑफ पाचाड’ असे म्हणू लागले आहेत.

जगातील इतर सर्व गुहांपेक्षा या गुहेची रचना पूर्ण वेगळी आहे. पाचाड खिंडीतून येथवर चढून आले की गुहेचे एक तोंड दिसते. या तोंडातून आत गेले की समोर येणारे दृश्‍य अचंबित करणारे आहे. दोन गोलाकृती प्रचंड भोके पलीकडील बाजूला आहेत. तिथवर गेले, की पाचाडचा भुईकोट किल्ला, पाचाड गाव व पाचाडपासून ते पाचाड खिंडीकडे येणारा घाटरस्ता व्यवस्थित पाहता येतो. Raigad Fort Information In Marathi.

या गुहेत सतत एकापाठोपाठ येणाऱ्या थंड वाऱ्याचा झ़ुळका आपला सारा थकवा दूर करतात. ज्या अर्थी अश्‍मयुगीन मानवाची इथे वस्ती होती. त्याअर्थी इथे जवळपास बारमाही पाण्याचे एखादे नैसर्गिक ठिकाण निश्‍चित असणार. त्याचा शोध घ्यायलाच हवा. रायगड पाहायला शेकडो-हजारो दुर्गयात्रींना या वाघबीळ गुहेची कल्पनाच नसते. अश्‍मयुगीन मानवाचे जुने वसतीस्थान, ३ तोंडे असणारी गुहा, तेथून दिसणारा उत्कृष्ट देखावा, सतत वाहणारा थंड वारा यांची अपूर्वाई येथे भेट देणाऱ्याला जाणवते.

शाळा महाविद्यालयांचा आणि अनेक पर्यटन कंपन्यांचा सहली रायगडावर आयोजित केल्या जातात. गडावर दोरवाटेने पाळण्यात बसून जाता येते, तर हजार-बाराशे पायऱ्या चढून रायगडावर पोहोचता येते. Raigad Fort Information In Marathi.

रायगडा पर्यंत जाण्याचे मार्ग :

१) मुंबई ते किल्ले रायगड मार्गे :

जर तुम्ही एसटी महामंडळ बस ने जाणार आसताल तर, तुम्हाला दादर वरून एसटी महामंडळ बस भेटेल. जर तुम्हाला वातान कुलीत एसटी महामंडळ बस हव्या असतील तर शिवशाही नेहमीच चालू असते. मुंबई वरून तुम्हाला  महाडला उतरावा लागत, महाड वरून २५ कि. मी. रायगड आहे. महाड गावा वरून पाचाड गाव हि एसटी महामंडळ बस भेटेल. पाचाड गावा पासून फक्त १ कि. मी. अंतरावर रायगड आहे.

जर तुम्ही रेल्वे ने जाणार आसताल तर, तुम्हाला पनवेल तो माणगाव रेल्वे भेटेल, नंतर तुम्हीला माणगाव बस स्टॉप ला ऑटो ने जावा लागत, तिथून महाड बस पकडून महाड गावा ला आल्या नंतर महाड बस स्टॅन्ड ते पाचाड गाव बस पकडून पाचाड गावी यावा लागत. पाचाड गावा पासून फक्त १ कि. मी. अंतरावर रायगड आहे.

जर तुम्ही गाडी ने जाणार आसताल तर, तुम्हाला मुबई – गोवा मार्गच यावा लागत, पेन आणि नंतर पाचाड गावी यावा लागत. पाचाड गावी राहण्या साठी खूप हॉटेल आहेत, पाचाड गावा पासून रायगड फक्त १ कि. मी. अंतरावर आहे.

२) पुणे ते किल्ले रायगड मार्गे :

जर तुम्ही एसटी महामंडळ बस ने जाणार आसताल तर,

पिंपरी चिंचवड (पुणे) ते वेळास. हि एसटी महामंडळ बस माणगाव-महाड मार्गे वेळासला जाते :-  पिंपरी चिंचवड – स्वारगेट – पौड – मुळशी – ताम्हिणी घाट – माणगाव – महाड बस स्टॅन्डला उतरायचे . महाड बसस्थानकावरून एक एसटी महामंडळ बस उपलब्ध आहे. जी थेट किल्ल्याच्या पायथ्या पर्यंत जाते. अन्यथा निजामपूर गावात जाणारी कोणतीही एसटी महामंडळ बस  तुम्ही पकडू शकता आणि पाचाड नाक्यावर अथवा पाचाड गावात उतरू शकता. पाचाड गावा पासून फक्त १ कि. मी. अंतरावर रायगड आहे.

तसेच, महाड बस बसस्थानका पासून तुम्हाला ६ सीटर ऑटो आहे. त्याच्याद्वारे तुम्ही थेट पाचाड गावा पर्यंत जाऊ शकता.  ज्यासाठी सुमारे ५0 रुपये शुल्क घेतात.

जर तुम्ही गाडी ने जाणार आसताल तर,

पुणे शिवाजी नजर नंतर  पुणे युनिव्हर्सिटी रोड मार्गे – पाषाण – सुस – नांदे – पिरंगुट – पौड – मुळशी – ताम्हिणी – ताम्हिणी घाट – भागड एम. आय. डी. सी. फाटा – निजामपूर गाव पासून पाचाड फाटा रोड त्या नंतर पाचाड गाव. पाचाड गावा पासून फक्त १ कि. मी. अंतरावर रायगड आहे.

गडावर जाण्याचे मार्ग :-

१) रायगड किल्ला वर चालत जाण्यासाठी सुमारे १,७३७ पायऱ्या आहेत.

२) रायगड किल्ला वर जाण्यासाठी रोपवेच्या साह्याने पण जात येते. रोपवेने जाण्यासाठी टेकीत घेवा लागते ते तिकीट रायगडाच्या पायथ्याला सर्जा हॉटेल मध्ये तिकीट काउंटर आहे इथे मिळते. त्या साठी एक फॉर्म भरावा लागतो. 

रोपवेने जाण्यासाठी प्रत्येक वेक्तीसाठी फक्त गाडावर जाण्यासाठी १९0 रुपये तिकीट आहे..

रोपवेने जाण्यासाठी गडावर जाऊन पारत खाली पारतं यायचं असेल तर ३१0 रुपये तिकीट आहे.

रोपवेने जाण्यासाठी जेस्ट नागरिकांना गडावर जाऊन पारत खाली पारतं यायचं असेल तर २00 रुपये तिकीट आहे.

छायाचित्र :

FAQs

१. रायगड जिल्ह्याचे जुने नाव काय ?
पूर्वी कुलाबा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्याचे “रायगड” असे नामकरण करण्यात आले.


२. रायगड किल्ल्यावर किती पायऱ्या आहेत ?
रायगडाला सुमारे १४३५ पायऱ्या आहेत.


३. रायगड किल्ल्याचे सुभेदार कोण होते ?
तानाजी मालुसरे (१६२६, गोडवली, सातारा – ४ फेब्रुवारी १६७० सिंहगड किल्ला) हे शिवाजी महाराजांच्या सैन्यातील एक सुभेदार व शिवाजी महाराजांचे बालपणीचे सवंगडी होते.


४. रायगड चढण्यास किती वेळ लागतो ?
रायगडावर चढण्यासाठी १४५0 पायऱ्या चढून जावे लागते. यासाठी साधारण दोन तास सहज लागू शकतात. तथापि सध्या रायगडावर जाण्यासाठी ‘रोपवे’ची व्यवस्था झाली आहे.

हे पण पहा : Shivneri Fort Information In Marathi.Shivneri Fort Information In Marathi | शिवनेरी किल्ल्याची माहिती मराठीत 2025.