Rajgad Fort Information In Marathi.
राजगड किल्ला
राजगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यात वसलेला एक डोंगराळ प्रदेशातील किल्ला आहे. राजगड हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. राजगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची पहिली राजधानी होती. Rajgad Fort Information In Marathi
राजगड (शाब्दिक अर्थ सत्ताधारी किल्ला ). पूर्वी मुरुंबदेव म्हणून ओळखला जाणारा, हा किल्ला छत्रपती शिवाजींच्या राजवटीत सुमारे २६ वर्षे मराठा साम्राज्याची पहिली राजधानी होती , त्यानंतर राजधानी रायगड किल्ल्यावर हलवण्यात आली . तोरणा नावाच्या लगतच्या किल्ल्यावरून सापडलेला खजिना राजगड किल्ला पूर्णपणे बांधण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी वापरला गेला.
राजगड किल्ला पुण्याच्या नैऋत्येला सुमारे ४८ किमी आणि नसरापूरपासून १५ किमी पश्चिमेला सह्याद्रीच्या रांगेत आहे आणि पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात व भोर गावाच्या वायव्येला २४ कि.मी. अंतरावर नीरा-वेळवंडी-कानंदी आणि गुंजवणी या नद्यांच्या खोऱ्यांच्या बेचक्यात मुरुंबदेवाचा डोंगर उभा आहे हा किल्ला समुद्रसपाटीपासून १,३७६ मीटर (४,५१४ फूट) उंचीवर आहे. किल्ल्याच्या पायथ्याचा व्यास सुमारे 40 किमी होता ज्यामुळे त्याला वेढा घालणे कठीण होते, ज्यामुळे त्याच्या सामरिक मूल्यात भर पडली. किल्ल्याच्या अवशेषांमध्ये राजवाडे, पाण्याची टाकी आणि गुहा आहेत. हा किल्ला मुरुंबादेवी डोंगर ( मुरुंबा देवीचा डोंगर ) नावाच्या टेकडीवर बांधला गेला . छत्रपती शिवाजींनी कोणत्याही गडावर सर्वाधिक दिवस मुक्काम केल्याचा अभिमान राजगडावर आहे. Rajgad Fort Information In Marathi
मावळ भागामध्ये राज्यविस्तार साध्य करण्यासाठी राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले मोक्याच्या ठिकाणी होते. तोरणा किल्ल्याचा बालेकिल्ला आकाराने लहान असल्यामुळे राजकीय केंद्र म्हणून हा किल्ला सोयीचा नव्हता. त्यामानाने राजगड दुर्गम असून त्याचा बालेकिल्ला बराच मोठा आहे. शिवाय राजगडाकडे कोणत्याही बाजूने येताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागते. एवढी सुरक्षितता होती,म्हणून आपले राजकीय केंद्र म्हणून शिवाजी महाराजांनी राजगडाची निवड केली. राजगडाला तीन माच्या व एक बालेकिल्ला आहे. राजगडचा बालेकिल्ला खूप उंच असून त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची १३९४ मीटर आहे. दुर्गराज राजगड त्यांच्या महत्त्वाकांक्षेची उंची दाखवतो, तर किल्ले रायगड हा शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा विस्तार दाखवतो. राजगडाच्या मध्यवर्ती ठिकाणी उंच डोंगर तासून तयार केलेला बालेकिल्ला म्हणजे पृथ्वीने स्वर्गावर केलेली स्वारी होय. Rajgad Fort Information In Marathi
राजगड म्हणजे महाराजांच्या आयुष्यातील सुरवातीच्या कालखंडाचा साक्षीदार होय! अभेद्यतेचे दुसरे रुप असलेला बालेकिल्ला, चिलखती तटबंदीचे बांधकाम, नेढे अशी वैशिष्ट्ये बाळगणारा एकमेव गड म्हणजे राजगड !पुण्याहून वेल्हा बस पकडून मार्गासनीस उतरावे. मार्गासनी-साखर मार्गे चोर दरवाजाने आपण गडावर जाऊ शकतो अथवा पुणे-वाजेघर बसने वाजेघरला उतरुन वाजेघर-पाली मार्गाने पाली दरवाज्याने गडावर जाता येते. तिसरा मार्ग म्हणजे पुणे-भुतोंडे बसने भुतोंड्यास जावे. भुतोंड्याहून अळू दरवाज्यानेही गडात शिरता येते. Rajgad Fort Information In Marathi
तीन दिशांना पसरत गेलेल्या तीन माच्या आणि मधोमध बालेकिल्ल्याची सोंगटी अशी या किल्ल्याचि रचना आहे. पद्मावती माचीवरील पद्मावतीच्या मंदिरात, दारुकोठारात आणि नुकत्याच बांधलेल्या वास्तूत निवाऱ्याची सोय होऊ शकते. पद्मावती माचीवरील राजसदर, संजीवनी माचीवरील चिखलताचे बांधकाम, सुवेळा माचीवरील नेढे आणि घसरगुंडीचा अनुभव मिळवून देणारा डुबा हे सर्व बघण्यास विसरु नका आणि या सर्वांचा शिरोमणी म्हणजे बालेकिल्ला! बालेकिल्ला चढण्याचा अनुभव अविस्मरणीय आहे.किल्ले राजगड, हिंदवी स्वराज्याची राजधानी,गडांचा राजा, राजियांचा गड,राजगड हे शिवाजी महाराजांचे पहिले प्रमुख राजकीय केंद्र. बुलंद, बेलाग आणि बळकट राजगड आजही आपल्याला हिंदुस्वराज्याची ग्वाही देत उभा आहे.Rajgad Fort Information In Marathi
राजगड इतिहास –
छत्रपती शिवरायांचा मुलगा राजाराम पहिला यांचा जन्म , शिवाजीची पत्नी सईबाई यांचा मृत्यू, आग्र्याहून शिवाजी परत येणे , अफझलखानाचे मस्तक बल्ले किल्ल्यातील महादरवाजात दफन करणे , यासह अनेक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनांचा हा किल्ला साक्षीदार आहे. सोनोपंत डबीर यांचे शिवाजीला कठोर शब्द . Rajgad Fort Information In Marathi
राजगड किल्ला इ.स. पहिल्या शतकातला आहे. या मुरूंबदेवाच्या डोंगराला किल्ल्याचे स्वरूप गौतमीपुत्र सातकर्णी म्हणजेच शालिवाहन राजा ज्याने युद्धात शकांना हारवून इ.स ७८ साली स्वतःच्या नावाचं शक सुरू केले, यानेच आठ वर्षांपूर्वी इ.स ७० साली ह्या मुरूंबदेवाच्या डोंगरावर सुंदर असा व उंचपुरा राजगड किल्ला बांधला. बहुधा सन १६४५ मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेऊन त्यावर बांधकाम केले व त्याचे नाव राजगड ठेवले.
मराठेशाहीची २५ वर्षे राजधानी याव्यतिरिक्त सदर किल्ल्यावर शिवाजीमहाराजांनाचे धाकटे चिरंजीव राजारामाचा जन्म व सईबाईंचे निधन या महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. राजगड हे शिवाजी महाराजांचे पहिले प्रमुख राजकीय केंद्र असून, हा बुलंद, बेलाग आणि बळकट राजगड आजही आपल्याला हिंदवी स्वराज्याची ग्वाही देत उभा आहे. नंतर राज्यकारभारासाठी गडावरची जागा अपुरी पडू लागल्याने राजांनी राजधानी त्यामानाने ऐसपैस आणि दुर्गम अशा रायगडावर नेली. Rajgad Fort Information In Marathi
सातवाहनपूर्व म्हणजे साधारण २००० वर्षा पूर्वीपासून हा डोंगर प्रसिद्ध आहे, असे इतिहासातून अस्पष्ट येणाऱ्या उल्लेखांवरून वाटते. एका ब्रम्हर्षी ऋषींचे येथे असणारे वास्तव्य व याच ब्रम्हर्षी ऋषींच्या नावावरून येथे स्थापन झालेले श्री ब्रम्हर्षी देवस्थान यावरून डोंगर फार पुरातन काळापासून ज्ञात असावा. राजगडाचे पूर्वीचे नाव होते मुरंबदेव. हा किल्ला बहामनी राजवटीमध्ये याच नावाने ओळखला जात असे. अर्थात त्यावेळी गडाचे स्वरूप फार काही भव्य दिव्य असे नव्हते. Rajgad Fort Information In Marathi
इ.स. १४९० च्या सुमारास अहमदनगरच्या निजामशाहीचा संस्थापक अहमद बहिरी याने बालेघाट आणि तळकोकणातील अनेक किल्ले जिंकून पश्चिम महाराष्ट्रात प्रभाव निर्माण केला आणि याच वेळी त्याने मुरुंबदेव किल्ला हस्तगत केला. मुरुंबदेवाचे गडकरी बिनाशर्त शरण आल्यामुळे अहमद बहिरीला किल्ला जिंकण्यास विशेष प्रयत्न करावे लागले नाही. पुढे किल्ल्यावर निजामशाहीची सत्ता प्रस्थापित झाल्यावर १२५ वर्षे किल्ल्यावर कोणाचाही हल्ला झाला नाही. इ. स. १६२५ च्या सुमारास मुरुंबदेव किल्ला, निजामशाहीकडून आदिलशाहीकडे आला. निजामशहाच्या वतीने बाजी हैबतराव शिळीमकर व त्याचे वडीलरुद्राजी नाईक या किल्ल्याची व्यवस्था पाहत होते. मलिक अंबरच्या आदेशानुसार बाजी हैबतरावाने मुरुंबदेवाचा ताबा आदिलशाही सरदार हैबतखानाकडे दिला. Rajgad Fort Information In Marathi
१६३० च्या सुमारास हा किल्ला आदिलशहाकडून परत निजामशाहीत दाखल झाला. शहाजीराजांचा अधिकारी सोनाजी या किल्ल्याचा कारभार पाहू लागला. विजापूर आदिलशाही सैन्याच्या एका तुकडीने किल्ल्यावर हल्ला केला. त्यात सोनाजी जखमी झाला. म्हणून बाळाजी नाईक शिळीमकर आपल्या तुकडीसह मुरुंबदेवाच्या रक्षणार्थ धावून गेला. तेव्हा बाळाजी नाईक जखमी झाला. या कामगिरीबद्दल शहाजीराजांनी बाळाजी नाईक शिळीमकरांचा नंतर सन्मानही केला. Rajgad Fort Information In Marathi
१६४७ छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला ताब्यात घेतला.
शिवाजी महाराजांनी मुरुंबदेवाचा किल्ला कधी घेतला याचा लिखित पुरावा आज मात्र उपलब्ध नाही. त्यामुळे किल्ला ताब्यात कधी आला हे सांगणे अनिश्चितच आहे. शिवचरित्र साहित्य खंडाच्या दहाव्या खंडात प्रसिद्ध झालले एक वृत्त सांगते की, ‘शिवाजीने शहामृग नावाचा पर्वत ताब्यात घेऊन त्यावर इमारत बांधली.’ सभासद बखर म्हणते की, ‘मुराबाद म्हणून डोंगर होता त्यास वसविले. त्याचे नाव राजगड म्हणून ठेविले. त्या गडाच्या चार माच्या वसविल्या. बखरकार सभासदाने बालेकिल्ल्याला सुद्धा एक माची म्हणून गणले आहे.’ मात्र शिवाजीने तोरण्यापाठोपाठ हा डोंगर जिंकून घेतला, Rajgad Fort Information In Marathi
हे नक्की. १६४९ गडाची डागडुजी सुरू झाली आणि शामराव नीळकंठ रांढेकर यांची पेशवेपदी नियुक्ती झाली . डोंगरावर किल्ला बांधण्याचे काम महाराजांनी मोठा झपाट्याने केले. त्या डोंगरास तीन सोंडा किंवा माच्या होत्या त्यांसही तटबंदी केली. १६५४ किल्ल्याचे नाव “राजगड” असे ठेवण्यात आले. नवीन तटबंदी आणि इमारतींचे बांधकाम सुरू झाले. मुख्य किल्ल्यास राजगड नाव ठेवून एक इमारत उभी केली. तीन माच्यांना सुवेळा, संजीवनी आणि पद्मावती ही नावे दिली. Rajgad Fort Information In Marathi
शिरवळ नजीक खेडबारे नावाचा गाव होता तेथे रान फार होते त्या ठिकाणी फर्माशी आंब्याची झाडे लावून पेठ वसविली व तिचे नाव शिवापूर असे ठेवले. १४ जानेवारी १६५८ उत्तर कोकण जिंकून छत्रपती शिवाजी महाराज राजगडावर परतले. ११ जुलै १६५९ अफझलखानाशी लढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडावर गेले . ५ सप्टेंबर १६५९ महाराणी सईबाई (छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी) यांचे राजगड किल्ल्यावर निधन झाले. १६६० जुलै छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या सिद्दी जौहरच्या वेढ्यातून निसटून राजगडावर आले. इसवी सन १६६० मध्ये औरंगजेबाच्या आज्ञेनुसार शाहिस्तेखानाने शिवाजी महाराजांच्या प्रदेशावर स्वारी केली. Rajgad Fort Information In Marathi.
फारसी साधनांमधून अशी माहिती मिळते की शाहिस्तेखानाने राजगडाकडे फौज पाठविलेली होती ह्या फौजेने राजगडाच्या जवळपासची काही खेडी जाळून उद्ध्वस्त केली परंतु प्रत्यक्ष राजगड किल्ला जिकंण्याचा प्रयत्न मात्र केला नाही. १६६१ जुलै प्रतापगडावर स्थापन होणारी भवानीमातेची मूर्ती प्रथम राजगडावर जिजाबाईंनी पाहणीसाठी आणली होती . १६६२ जानेवारी राजगड किल्ल्याचे बांधकाम पूर्ण झाले आणि पेण आणि कल्याण काबीज करून छत्रपती शिवाजी महाराज गडावर परतले.
६ एप्रिल १६६३ रोजी शाहिस्तेखानावर छापा घालून शिवाजी महाराज राजगडावर परतले. १६६४ फेब्रुवारी सुरतची लूट राजगडावर आणली. सन १६६५ मध्ये मिर्झाराजे जयसिंग याने शिवाजी महाराजांच्या प्रदेशावर स्वारी केली. दाऊदखान आणि रायसिंग या दोन सरदारांना त्याने या परिसरातील किल्ले जिंकण्यासाठी पाठविले. ३० एप्रिल १६६५ रोजी मोगल सैन्याने राजगडावर चाल केली. परंतु मराठ्यांनी किल्ल्यावरून विलक्षण मारा केल्यामुळे मोगलांना माघार घ्यावी लागली. Rajgad Fort Information In Marathi
१६६५ मध्ये मुघल सेनापती जयसिंग पहिला , मुघल सैन्याचा नेता याच्यासोबत पुरंदरच्या तहावर स्वाक्षरी करताना शिवाजीने ठेवलेल्या १२ किल्ल्यांपैकी राजगड किल्ला देखील एक होता . या तहानुसार २३ किल्ले मुघलांच्या स्वाधीन करण्यात आले. १६६५ जून छत्रपती शिवाजी महाराजांनी पराभव स्वीकारल्याचे पत्र जयसिंगला पाठवले. Rajgad Fort Information In Marathi
शिवाजी महाराजांनी जयसिंगाबरोबर तह करताना २३ किल्ले देण्याचे मान्य केले व स्वतःकडे १२ किल्ले ठेवले. या १२ किल्ल्यांमध्ये राजगड, तोरणा, लिंगाणा, रायगड यांचा समावेश होतो सभासद बखरीतील उल्लेख खालील प्रमाणे आहे’ सत्तावीस किल्ले तांब्रास दिले. निशाणे चढविली. वरकड राजगड व कोट मोरोपंत पेशवे, निळोपंत मुजुमदार व सरनोबत नेताजी पालकरअसे मातुश्रींच्या हवाली केले व आपणही दिल्लीस जावे, बादशाहाची भेट घ्यावी असा करार केला.’ Rajgad Fort Information In Marathi
शिवाजी महाराज आग्ऱ्याहून निसटून निवडक लोकांनिशी १२ सप्टेंबर १६६६ ला राजगडाला सुखरूप पोचले. २४ फेब्रुवारी १६७० रोजी राजगडावर राजारामाचा जन्म झाला. सिंहगड किल्ला घेण्यासाठी शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे यास राजगडावरूनच १६७० मध्ये पाठविले. सन १६७१-१६७२ मध्ये शिवाजी महाराजांनी रायगड हे स्थान राजधानीसाठी निश्चित केले, त्याआधी रायगड किल्ल्याचे इ.स १६५६ ते १६७० पर्यंत स्वराज्याचे वास्तुशास्त्रज्ञ हिरोजी इंदळकर यांच्या देखरेखीखाली १४ वर्षे बांधकाम चालू होते. त्यानंतर राजधानी राजगडावरून रायगडाकडे हलविली गेली. ६ जून १६७४ छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रियागार्ड किल्ल्यावर झाला. Rajgad Fort Information In Marathi
बुधवार ३ एप्रिल १६८०, शा.शके १६०२ चैत्र शुद्ध पौर्णिमा, हनूमान जयंतीला शिवाजी महाराजांच निधन झाल्यावर मराठी राज्यावर औरंगजेबाच्या स्वारीचे संकट कोसळले. ११ मार्च १६८९, शा.शके १६११ फाल्गुन अमावस्येला औरंगजेबाने संभाजी महाराजांना ठार मारले यानंतर मोगलानी मराठांचे अनेक गड जिंकून घेण्याचा प्रयत्न केला. किशोरसिंह हाडा या मोगल सरदाराने जून १६८९ मध्ये राजगड जिंकून घेतला. औरंगजेबाने अबुलखैरखान याला राजगडाचा अधिकारी म्हणून नेमले.
मात्र आप संभाजी महाराजांना पकडल्याची वार्ता पसरली नव्हती त्यामुळे मराठ्यांची फौज राजगडाभोवती गोळा झाली आणि आपल्या बळावर राजगड पुन्हा जिंकून घेतला. १६९२ शंकरजी नारायण यांनी मुघलांकडून किल्ला ताब्यात घेतला. जानेवारी १६९४ मधील एका पत्रात शंकराजी नारायण सचिव याने ‘कानद खोऱ्यातील देशमुखांनी राजगडाच्या परिसरातील प्रदेशाचे मोगलांच्या हल्ल्यापासून संरक्षण केल्याबद्दल त्यांची इनामे त्यांचकडे चालवावीत ‘ असा आदेश दिला होता. Rajgad Fort Information In Marathi
१६९७ राजाराम महाराष्ट्रात परतले आणि त्यांनी राजगड ही आपली नवी राजधानी केली. ४ ऑगस्ट १७०१ शहाजी मोहिते यांना पद्मावती माचीचा हवालदार करण्यात आला. पुढे ११ नोहेंबर १७०३ मध्ये स्वतः औरंगजेब जातीनिशी हा किल्ला जिंकण्यासाठी पुण्याहून निघाला. औरंगजेबाचा हा प्रवास मात्र सुखकर झाला नाही. राजगडाच्या अलीकडे चार कोस घाटातला रस्ता आहे. रस्ता केवळ दुर्गम होता औरंगजेबाने एक महिना आधी काही हजार गवंडी, बेलदार आणि कामदार यांना रस्ता नीट करण्याच्या कामावर पाठविले. पण रस्ता काही नीट झाला नव्हता त्यामुळे बरेचशे सामान आहे तिथे टाकून जावे लागले. Rajgad Fort Information In Marathi.
२ डिसेंबर १७०३ रोजी औरंगजेब राजगडाजवळ पोहचला. किल्ल्यास मोर्चे लावले. किल्ल्याचा बुरुज तीस गज उंच; त्याच उंचीचे दमदमे तयार करून त्यावर तोफा चढविल्या व बुरुजावर तोफांचा भडिमार करु लागले. तरबियतखान आणि हमीबुद्दीनखान याने पद्मावतीच्या बाजूने मोर्चे लावले. पुढे दोन महिने झाले तरी किल्ला काही हातात येत नव्हता. शेवटी ४ फेब्रुवारी १७०३ रोजी राजगड औरंगजेबाच्या हातात पडला. १८ फेब्रुवारी १७०४ तहाचा एक भाग म्हणून हा किल्ला औरंगजेबाला देण्यात आला. इरादतखान याला औरंगजेबाने किल्लेदार नेमले आणि किल्ल्याचे नाव ‘नाबिशहागड’ असे ठेवले. सिदोजीराव थोपटे आणि संताजी शिळीमकर यांना औरंगजेबाने येथे मारले. Rajgad Fort Information In Marathi
२९ मे १७०७ रोजी गुणाजी सावंत याने पंताजी शिवदेवासह राजगडावर स्वारी करून तो किल्ला जिंकून घेतला आणि पुन्हा किल्ला मराठयांच्या स्वाधीन झाला. पुढे शाहूच्या ताब्यात किल्ला आल्यावर १७०९ मध्ये शाहूने सुवेळा माचीस ३०० रुपये व संजीवनी माचीस १०० रुपये अशी व्यवस्था लावून दिली. पेशवेकाळात राजगड हा सचिवांच्या ताब्यात होता. पेशवाईमध्ये आर्थिक परिस्थिती वांरवार बिघडत असल्याने किल्ल्यावर शिबंदीचे पगारही वेळेवर होत नसत. अशाच परिस्थितीमध्ये राजगडावरील सेवकांचे पगार एक वर्षभर थकले होते – राजवाडे खंड १२. यानंतर राजगड भोर संस्थानाच्या ताब्यात गेला. त्याची व्यवस्था पाहण्यासाठी सहा अधिकारी नेमले. सुवेळा माचीसाठी सरनोबत शिळीमकर, पद्मावती माचीसाठी सरनोबत-पवार घराण्यातील, संजीवनी माचीसाठी सरनोबत- खोपडे घराण्यातील होते. याशिवाय नाईक व सरनाईक हे अधिकारीसुद्धा असत. १८१८ राजगड किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. Rajgad Fort Information In Marathi
१) ‘राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले उभ्या स्वरूपाचे असून अशा ठिकाणी वसले आहेत की मावळयांचे नेते छत्रपती शिवाजीराजे भेासले यांना राज्यविस्तारासाठी या किल्ल्यांचा भरपूर उपयोग झाला.’
२) साकी मुस्तैदखान त्याच्या मासिरे आलिमगिरे नावाच्या ग्रंथात म्हणतो- ‘राजगड हा अतिशय उंच. त्याची उंची पाहता सर्व किल्ल्यात तो श्रेष्ठ होय असे म्हणता येईल. त्याचा घेर १२ कोसांचा आहे (१ कोस = ३.२ कि.मी ). त्याच्या मजबूतीची तर कल्पनाही करवत नव्हती. डोंगराच्या दऱ्याखोऱ्यातून आणि घनघोर अरण्यातून वाऱ्याशिवाय दुसरे काही फिरकू शकत नाही. येथे पावसालाच फक्त वाट मिळू शकते. इतर कोणीही त्यातून जाऊ शकत नाही.’
३) महेमद हाशीम खालीखान हा ‘मुन्तखबुललुबाब-ए-महेमदॉशाही ‘ नामक ग्रंथामध्ये म्हणतो, ‘राजगड किल्ल्याचे मी कसे वर्णन करु? काय त्या किल्ल्याची उंची, काय त्याचा विस्तार ! जणू काही आकाशच पसरले होते. त्याचे टोक पाहून छाती दडपे. त्याच्या भाराने पृथ्वी धारण करणारा पाताळातील वृषभ ओरडत असावा. त्या भागात सापांचा सुळसुळाट होता. जिकडे तिकडे निरनिराळ्या प्रकारचे हिंस्त्र पशू दिसत. त्यामुळे सगळे त्रस्त होऊन गेले. राजगड किल्ला म्हणजे डोंगराची रांग त्याचा घेर बारा कोसांचा त्याला सगळीकडून वेढा घालणे कठीण होते.
पहाण्याची ठिकाणे :
१.पद्मावती तलाव :
गुप्त दरवाजाकडून पद्मावती माचीवर आल्यावर समोरच सुबक बांधणीचा विस्तीर्ण असा तलाव आढळतो. तलावाच्या भिंती आजही शाबूत आहेत. तलावात जाण्यासाठी त्याच्या भिंतीतच एक कमान तयार केलेली आहे. तलावात सध्या गाळ मोठ्या प्रमाणात साचला आहे.
२.रामेश्वराचे मंदिर :
पद्मावती देवीच्या मंदिरा समोरच पूर्वाभिमुख असे रामेश्वर मंदिर आहे. मंदिरातील शिवलिंग शिवकालीन आहे. मंदिरात असणारी मारूतीरायांची मूर्ती दक्षिणाभिमुख आहे.
३.राजवाडा :
रामेश्वर मंदिरापासून पायर्यांनी वर जातांना उजवीकडे राजवाड्याचे काही अवशेष दिसतात. या राजवाड्यामध्ये एक तलाव आहे. याशिवाय राजवाड्यापासून थोडे पुढे गेल्यावर अंबारखाना लागतो. याच्या थोडे पुढे सदर आहे. सदरेच्या समोर दारुकोठार आहे.
४.सदर :
ही गडावरची सर्वात महत्वाची अशी वास्तू आहे. रामेश्वर मंदिरापासून पायर्यांनी वर गेल्यावर उजव्या हातास राजवाड्याचे अवशेष आहेत. थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे सदर आहे. पूर्वी या सदरेत ओटीच्या कडेस मधल्या खणात एक जुना गालिचा व त्यावर लोड ठेवलेला असे. अनेक इतिहास तज्ज्ञांचे असे मत आहे की ही सदर नसून तटसरनौबताचे घर आहे.
५.पाली दरवाजा :
पाली दरवाजाचा मार्ग पाली गावातून येतो. हा मार्ग फार प्रशस्त असून चढण्यासाठी पायर्या खोदल्या आहेत.पाली दरवाजाचे पहिले प्रवेशद्वार भरपूर उंचीचे आणि रुंदीचे आहे, यातून हत्ती सुद्धा अंबारीसह आत येऊ शकतो. हे प्रवेशद्वार ओलांडून २०० मी. पुढे गेल्यावर भरभक्कम बांधणीचे दुसरे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराचे संरक्षण चांगल्या बुलंद अशा बुरुजांनी केलेले आहे. या दरवाजाचे वैशिष्ट्य म्हणजे दरवाजाच्या वर आणि बुरुजावर परकोट बांधलेले आहेत. या परकोंटाना गोल आकाराचे झरोके ठेवलेले आढळतात. अशा झरोक्यांना ’फलिका’ असे म्हणतात. या फलिकांचा उपयोग तोफा डागण्यासाठी होत असे. दरवाजातून आत शिरल्यावर दोन्ही बाजूस पहारेकर्यांच्या देवड्या आहेत. या दरवाजाने गडावर आल्यावर आपण पद्मावती माचीवर पोहोचतो.
६.गुंजवणे दरवाजा :
गुंजवण दरवाजा म्हणजे एकामागे एक असलेल्या तीन प्रवेशद्वारांची एक मालिका आहे. पहिला दरवाजा अत्यंत साध्या बांधणीचा आहे. मात्र दरवाजाला दोन्ही बाजूस भरभक्कम बुरुज आहेत. गुंजवणे दरवाजाच्या दुसर्या प्रवेशद्वाराला वैशिष्टपूर्ण कमान आहे. या दरवाजाच्या शेवटी व गणेश पट्टीच्या खाली दोन्हीकडे दोन उपडे घट घेतलेल्या व एका कमलकलिके समोर असलेल्या सोंडा आहेत. सांप्रत या शिल्पावरुन श्री किंवा गजशिल्प तयार झाले असावे असे अनुमान निघते. या सर्व गोष्टींवरुन असे अनुमान निघते की, हे प्रवेशद्वार शिवपूर्वकालात बांधलेले असावे. प्रवेशद्वाराच्या आत पहारेकर्यांच्या देवड्या आहेत.
७.पद्मावती माची :
राजगडाला एकूण ३ माच्या आहेत. यापैंकी सर्वात प्रशस्त अशी माची म्हणजे पद्मावती माची. पद्मावती माची केवळ एक लष्करी केंद्र नसून निवासाचे ठिकाणही होते. माचीवर बांधकामाचे अनेक अवशेष सापडतात. पद्मावती देवीचे मंदिर, सईबाईंची समाधी ,हवालदारांचा वाडा, रत्नशाला, सदर, पद्मावती तलाव, गुप्त दरवाजा, पाली दरवाजा, गुंजवणे दरवाजा, दारुगोळ्याची कोठारे या वास्तू आजही शिल्लक आहेत. याशिवाय पद्मावती माचीवर ब्राम्हणवर्गाची आणि अष्टप्रधान मंडळाची काही घरे आहेत.
८.पद्मावती मंदिर :
सध्या २००२ मध्ये या मंदिराचा जीर्णोध्दार केला आहे. शिवरायांनी किल्ले मुरुंबदेवाचे राजगड म्हणून नामकरण केल्यावर येथे असलेल्या जागेवर पद्मावती देवीचे मंदिर बांधले असा उल्लेख आढळतो. सध्या मंदिरात आपल्याला तीन मूर्त्या दिसतात. मुख्य पुजेचे मूर्ती भोरच्या पंत सचिवांनी स्थापन केलेली आहे. त्याच्या उजव्या बाजुला लहान असलेली मूर्ती शिवरायांनी स्थापित केलेली आहे, तर दोन मूर्तीच्या मध्ये शेंदूर फासलेला तांदळा म्हणजे पद्मावती देवीची मुर्ती आहे.या मंदिरात सध्या २० ते ३० जणांना राहता येते. मंदिराच्या बाजूसच पाण्याचे टाके आहे. यातील पाणी पिण्यासाठी योग्य आहे. मंदिराच्या समोरच सईबांईची समाधी आहे.
९.संजीवनी माची :
सुवेळा माचीच्या बांधणीनंतर शिवाजीमहाराजांनी या माचीचे बांधकाम करण्यास सुरवात केली. माचीची एकूण लांबी अडीच किमी आहे. ही माची सुद्धा ३ टप्प्यांमध्ये बांधलेली आहे. संजीवनी माचीवरील घरांचे अवशेष आजही अस्तित्वात आहेत. माचीच्या प्रत्येक टप्प्यास चिलखती बुरुज आहेत. पहिला टप्पा खाली उतरुन उत्तरेकडे वळून तटालागत थोडे मागे चालत गेल्यावर तीन तिहेरी बांधणीचे बुरुंज लागतात. या तिन्ही बुरुजावर शिवकालात प्रचंड मोठ्या तोफा असाव्यात. या माचीवर अनेक पाण्याची टाकी आहेत. या माचीला एकूण १९ बुरुज आहेत.
माचीला भुयारी परकोटाची योजना केलेली आहे या भुयारातून बाहेरील तटबंदी कडे येण्यासाठी दिंड्यांची व्यवस्था केलेली आहे. संजीवनी माचीवर आळु दरवाजाने सुद्धा जाता येते. आळु दरवाजा पासून राजगडाची वैशिष्टय असलेली चिलखती तटबंदी दुतर्फा चालू होते. दोन्ही तटांमधील अंतर अर्धा ते पाऊण मीटर असून खोली सुमारे ६ ते ७ मीटर आहे. या भागात बुरुजांच्या चिलखतात उतरण्यासाठी पायर्यांच्या दिंड्या आहेत. तसेच नाळेतून वर येण्यासाठी दगडी सोपान आहेत. माचीवर तटबंदी मध्ये काही जागी प्रातर्विधीची ठिकाणे (शौचकुप) आढळतात. दुहेरी तटबंदीच्या शेवटी बलाढ्य बुरुज आहेत. यांचा उपयोग दूरवर नजर ठेवण्यासाठी होत असे.
१०.आळु दरवाजा :
संजीवनी माचीवर येण्यासाठी या दरवाजाचा उपयोग होत असे. तोरणा वरुन राजगडावर येण्याचा एकमेव मार्ग या दरवाजातून जात असे. आळु दरवाजा सद्यस्थितीला ढासाळलेल्या अवस्थतेत आहे. या दरवाजावर एक शिल्प आहे. वाघाने एक सांबार उताणे पाडले आहे,असे चित्र या शिल्पात दाखवले आहे.
११.सुवेळा माची :
मुरुंबदेवाचा किल्ला ताब्यात आल्यानंतर शिवाजी महाराजांनी किल्ल्याच्या पूर्वेकडील डोंगररांगेला भरभक्कम तटबंदी बांधली, आणि माचीला सुवेळा माची असे नाव ठेवले. पूर्वेकडे ही माची असल्यामुळे या माचीचे नाव “सुवेळा” असे ठेवले. सुवेळा माची ही संजीवनी एवढी लांब नाही. मात्र या माचीचे सुद्धा ३ टप्पे आहेत. पूर्वेकडे ही माची चिंचोळी होत गेलेली आहे.
माचीच्या प्रारंभी टेकडी सारखा भाग आहे याला “डुबा” असे म्हणतात. या डुब्याच्या डावीकडून रानातून जाणार्या वाटेने गेल्यावर शिबंदी घरटे दिसतात. तेथे डाव्या हातास एक दक्षिणमुखी वीर मारुती व त्याच्या जवळ पाण्याचे टाक आहे. येथे असणारे चौथरे म्हणजे एके काळी येसाजी कंक, तानाजी मालसुरे व शिलींबकर या सरदारांची घरे होती. येथून सरळ जाणारी वाट सुवेळा माचीच्या दुसर्या टप्प्यावर जाते, तर डावीकडे जाणारी वाट काळेश्वरी बुरुजाच्या परिसरात घेऊन जाते. आपण माचीच्या दिशेने थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे एक सदर लागते. येथून पुढे तटबंदीच्या खरा भाग सुरु होतो. येथील तटबंदी दोन टप्प्यांत विभागली असून प्रत्येक टप्प्याच्या शेवटी चिलखती बुरुज आहे.
दुसर्या टप्प्यात गेल्यावर तटबंदीच्या दोन्ही बाजूस आतील अंगास भुयारी चिलखती परकोटाची रचना केलेली आहे. दुसर्या टप्पयाकडे जातांना एक उंच खडक लागतो आणि या खडकात ३ मीटर व्यासाचे एक छिद्र आढळते. या खडकालाच नेट किंवा ’हत्तीप्रस्तर’ असे म्हणतात. या हत्तीप्रस्तराच्या अलीकडे तटातील गणपती आढळतो व तेथूनच पुढे तटातून खाली जाण्यासाठी गुप्त दरवाजा आहे. या दरवाजाला “मढे दरवाजा” असे म्हणतात. हत्ती प्रस्तराच्या पुढील भागात सुद्धा एक असाच गुप्त दरवाजा आहे. सुवेळा माचीच्या तटबंदीला एकुण १७ बुरुज आहेत. त्यापैकी ७ बुरुजांना चिलखती बुरुजांची सोय आहे.
सुवेळा माचीच्या सर्वात शेवटच्या टप्प्यात खालच्या भागात वाघजाईचे शिल्प आहे.
१२.काळेश्वरी बुरुज आणि परिसर :
सुवेळा माचीच्या दुसर्या टप्प्याकडे जाणार्या वाटेच्या उजवीकडे वळल्यावर आपल्याला पाण्याची काही टाकी दिसतात. पुढे रामेश्वर मंदिराचे काही अवशेष आहेत. या रामेश्वर मंदिरात शिवलिंग, भग्न नंदी, एक यक्षमूर्ती अशी शिल्पे आढळतात.या रामेश्वर मंदिराच्या वरील बाजूस शिलाखंडावर गणेशाची प्रतिमा, पार्वती, शिवलिंग अशी शिल्पे आहेत. येथून थोडेसे पुढे गेल्यावर काळेश्वरी बुरुज आहे. येथेच तटात एक गुप्त दरवाजा देखील आढळतो.
१३.बालेकिल्ला :
राजगडाच्या सर्वात उंच भाग म्हणजे बालेकिल्ला होय. या बालेकिल्ल्याकडे जाणारा रस्ता कठीण आणि अरुंद आहे. चढण संपल्यानंतर बालेकिल्ल्याचा दरवाजा लागतो यालाच महादरवाजा असे ही म्हणतात. आजही दरवाजा चांगल्या स्थितीत आहे. प्रवेशद्वाराची उंची ६ मीटर असून प्रवेशद्वारावर कमळ, स्वस्तिक ही शुभचिन्ह कोरलेली आहेत.
बालेकिल्ल्याला साधारण १५ मीटर उंचीची तटबंदी बांधलेली असून विशिष्ट अंतरावर बुरुजही ठेवलेले आहेत.
दरवाजातून आत गेल्यावर समोरच जननीमंदिर आहे. येथून पुढे गेल्यावर चंद्रतळे लागते. तळ्याच्या समोरच उत्तरबुरुच आहे. येथून पद्मावती माची आणि इतर सर्व परिसर दिसतो. बुरुजाच्या खालून एक पायवाट बालेकिल्ल्यावर येते. आता मात्र ही वाट एक मोठा शिलाखंड टाकून बंद केलेली आहे. ही वाट ज्या बुरुजावरून वर येते त्या बुरुजाला “उत्तर बुरुज” असे म्हणतात. येथून संपूर्ण राजगडाचा घेरा आपल्या लक्षात येतो. या उत्तर बुरुजाच्या बाजुला ब्रम्हर्षी ऋषींचे मंदिर आहे. या शिवाय बालेकिल्ल्यावर काही भग्न अवस्थेतील इमारती चौथरे, वाड्यांचे अवशेष आढळतात.
राजगड किल्ला संपूर्ण पाहण्यासाठी साधारण २ दिवस लागतात. गडावरुन तोरणा, प्रतापगड, रायगड, लिगांणा, सिंहगड, पुरंदर, वज्रगड, मल्हारगड, रोहीडा, रायरेश्वर आणि लोहगड, विसापूर हे किल्ले दिसतात.
पोहोचण्याच्या वाटा :-
पुण्याहून राजगड किल्ल्याकडे जाण्यासाठी बसने कसे जावे :-
१. बस : राजगड किल्ला पर्यंत जाण्यासाठी थेट बस नाही. परंतु पुणे ते वेल्हे या बस ने राजगड जवळ जाऊ शकता.
कात्रज – हॉटेल किनारा – गुजरवाडी – मांगडेवाडी पेट्रोल पंप – मांगडेवाडी – निसर्ग हॉटेल – भिलारेवाडी – वाघजाई मंदिर – डाक बंगला – घाट उत्तर वळण – बोगदा कात्रज – गंगालवाडी फाटा – शिंदेवाडी सातारा रोड – ससेवाडी फाटा – वेलू फाटा – ग्रँड हॉटेल – शिवापूर बौग – कोंढणपूर फाटा – खेड शिवापूर – हॉटेल सागर – बोरमाळ – कोपो फाटा – शिवरे फाटा – प्रवीण मसाला कंपनी – अशोक लेलँड गोडाउन – वर्वेगाव – काळूबाई मंदिर – शिवानंद इन्कलावे कंपनी – कालवडे गाव फाटा –
– सांगवी कंपनी – चेलाडीगँ फाटा – दळवी वस्ती – नसरापूर बस स्टॅन्ड – स्वप्नलोक – नसरापूर गाव – निदान सांगावी फाटा – मालेगाव – लक्समिमाता मंदिर – मालेगाव – हातवे फाटा – मातोश्री कार्यालय – विरवाडी जांभळी – जांभळी फाटा – गणराज हॉटेल – भक्ती मंगल कार्यालय – कुरुन्ग्वाडी फाटा – मराठा दरबार – हॉटेल अमृतराज – घोरपडल – सांगावी बुद्रुक – आंबवणे – तानाजी वॉलाँग हाय स्कूल – चापट वस्ती – जीवन ज्योती व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र – दत्त मंदिर – कारंजावणे – कारंजावणे – पार्वती मंगल कार्यालय – अडवली – सम्राट प्लास्ट – घोटावडे फाटा – मांगडेवाडी – हॉटेल साईराज – मार्गासनी – इथून पुढे ५-६ की.मी. राजगड किल्ला आहे , पण तिकडे बस जात नाही.
२. रेल्वे : थेट राजगड किल्ला पर्यंत कुठलीही रेल्वे जात नाही.
३. खाजगी वाहन : मित्रांनो, राजगड किल्ला बघण्यासाठी आपण खाजगी वाहन दुचाकी अथवा चारचाकीने पुणे इथून खूप मार्गाने जाऊ शकतो,
पुणे – स्वारगेट – कात्रज – कात्रज घाट – शिंदेवाडी – कोंढणपूर फाटा – खेड शिवापूर – कुसगाव खिंड रोड – मांगदरी – मार्गासनी – राजगड रोड – राजगड.
मुंबईहून राजगड किल्ल्याकडे जाण्यासाठी बसने कसे जावे :
१ . बस : राजगड किल्ला पर्यंत जाण्यासाठी थेट बस नाही.
मुंबई – पुणे बस स्टॅन्ड – स्वारगेट बस स्टॅन्ड – स्वारगेट ते राजगड बस – राजगड फाटा – राजगड किल्ला पर्यंत ऑटो ने जावे लागते.
२. रेल्वे : थेट राजगड किल्ला पर्यंत कुठलीही रेल्वे जात नाही.
कुर्ला रेल्वे स्टेशन – कर्जत रेल्वे स्टेशन – पुणे रेल्वे स्टेशन – स्वारगेट बस स्टॅन्ड – स्वारगेट ते राजगड बस – राजगड फाटा – राजगड किल्ला पर्यंत ऑटो ने जावे लागते.
३. खाजगी वाहन : मित्रांनो, राजगड किल्ला बघण्यासाठी आपण खाजगी वाहन दुचाकी अथवा चारचाकीने पुणे इथून खूप मार्गाने जाऊ शकतो,
मुंबई – नवी मुंबई – लोणावळा – कामशेत – देहू रोड सरकल- वारजे – शिंदेवाडी – कोंढणपूर फाटा – खेड शिवापूर – कुसगाव खिंड रोड – मांगदरी – मार्गासनी – राजगड रोड – राजगड.
नाशिकहून राजगड किल्ल्याकडे जाण्यासाठी बसने कसे जावे :
१. बस : राजगड किल्ला पर्यंत जाण्यासाठी थेट बस नाही.
नाशिक – सिन्नर – संगमनेर – आळेफाटा – नारायणगाव – मंचर – राजगुरूनगर – चाकण – मोशी – भोसरी – पुणे – स्वारगेट – स्वारगेट बस स्टॅन्ड – स्वारगेट ते राजगड बस – राजगड फाटा – राजगड किल्ला पर्यंत ऑटो ने जावे लागते.
२. रेल्वे : थेट राजगड किल्ला पर्यंत कुठलीही रेल्वे जात नाही.
३. खाजगी वाहन : मित्रांनो, राजगड किल्ला बघण्यासाठी आपण खाजगी वाहन दुचाकी अथवा चारचाकीने जाऊ शकतो,
नाशिक – सिन्नर – संगमनेर – आळेफाटा – नारायणगाव – मंचर – राजगुरूनगर – चाकण – मोशी – भोसरी – पुणे – स्वारगेट – कात्रज – कात्रज घाट – शिंदेवाडी – वर्वे – नसरापूर फाटा – नसरापूर – आंबावणे – कोडवडी फाटा – भागीनगहार – राजगड.
सह्याद्रीच्या उंचीवर वसलेला राजगड किल्ला हा महाराष्ट्राच्या इतिहासाचे आणि पराक्रमाचे प्रतीक आहे. स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून गौरवलेला हा किल्ला शिवरायांच्या शौर्य आणि राज्यकारभार कौशल्याची साक्ष देतो. नैसर्गिक सुदृढता, प्रभावी वास्तुकला आणि असंख्य ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेला राजगड किल्ला प्रत्येक पर्यटकाला आणि इतिहासप्रेमीला भुरळ पाडतो. पन्हाळा गड, गुप्त दरवाजा, जलनिर्माण तळी, शिवधारा आणि महादुर्गा मंदिर या किल्ल्यावरील अनेक आकर्षणे पर्यटकांना आकर्षित करतात. ट्रेकिंग, निसर्गाचे सौंदर्य आणि इतिहास यांचे मिश्रण असलेला राजगड किल्ला हा महाराष्ट्राचा अभिमान आणि प्रत्येक मराठी माणसाने अनुभव घेण्यासारखा आहे.
FAQs
१. राजगड म्हणजे काय ?
राजगड (शाब्दिक अर्थ सत्ताधारी किल्ला ) हा भारताच्या महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात वसलेला एक डोंगराळ प्रदेशातील किल्ला आहे. पूर्वी मुरुंबदेव म्हणून ओळखला जाणारा हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीत सुमारे २६ वर्षे मराठा साम्राज्याची पहिली राजधानी होती, त्यानंतर राजधानी रायगड किल्ल्यावर हलवण्यात आली.
२. राजगडाला गडांचा राजा आणि राजांचा गड असे का म्हणतात ?
राजगड हा एक ऐतिहासिक किल्ला आहे जो छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला होता. ‘गडांचा राजा’ असे म्हणण्याचे कारण म्हणजे राजगड हा किल्ला इतर किल्ल्यांच्या तुलनेत अधिक महत्त्वाचा आणि प्रभावी होता. राजगडाच्या भव्यतेमुळे आणि त्याच्या सामरिक स्थानामुळे त्याला ‘गडांचा राजा’ असे संबोधले जाते.
३. राजगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय होते ?
राजगडाचे पूर्वीचे नाव होते मुरंबदेव. हा किल्ला बहामनी राजवटीमध्ये याच नावाने ओळखला जात असे. अर्थात त्यावेळी गडाचे स्वरूप फार काही भव्य दिव्य असे नव्हते. इ.
४. मुरुंब देवाच्या डोंगरावर बांधलेला किल्ला कोणता आहे ?
राजगड किल्ला “मुरुंब देवाचा डोंगर” नावाच्या टेकडीवर बांधलेला आहे. शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यातील बहुतांश काळ राजगड किल्ल्यावर घालवला.
५. स्वराज्याची पहिली राजधानी कोणती होती ?
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी कोणती ? असे तर विचारले तर कुणीही रायगड असेच सांगेल. परंतु, रायगडापूर्वी पुण्याजवळ असलेल्या राजगड या प्राचिन किल्ल्याने तब्बल 26 वर्षे स्वराज्याच्या राजधानीचा मान मिरवला.
६. राजगड कोणत्या जिल्ह्यात आहे ?
राजगड किल्ला Rajgad Fort – १३९४ मीटर उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. पुणे जिल्ह्यातील पुणे डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो. राजगड म्हणजे महाराजांच्या आयुष्यातील सुरवातीच्या कालखंडाचा साक्षीदार होय!
हे पण पहा : https://marathimavla.com/raigad-fort-information-in-marathi/#more-312