Shivneri Fort Information In Marathi | शिवनेरी किल्ल्याची माहिती मराठीत 2025.

Shivneri Fort Information In Marathi

शिवनेरी किल्ला

शिवनेरी किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे. जुन्नर मध्ये जाताच शिवनेरी किल्ल्याचे दर्शन होते. शिवनेरी हा प्राचीन किल्ला पुण्यापासून १०५ किलोमीटर अंतरावर आहे, तर जुन्नर गावापासून ४ किमी अंतरावर आहे. महाराष्ट्राचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे हे जन्मस्थान आहे. Shivneri Fort Information In Marathi

शिवनेरी किल्ल्याचा इतिहास :-

       ‘जीर्णनगर’,’जुन्नेर’ म्हणजेच जुन्नर शहर आहे. जुन्नर ही शक राजा नहपानाची राजधानी होती. सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा नाश केला आणि जुन्नर येथील सर्व परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. नाणेघाट हा पुरातन व्यापारी मार्ग आहे. या मार्गावरून फार मोठ्या प्रमाणात वाहतूक चालत असे. या मार्गावर नजर ठेवण्यासाठी शिवनेरी किल्ल्याची  निर्मिती करण्यात आली. सातवाहनांची सत्ता स्थिरावल्यानंतर त्यांनी येथे अनेक ठिकाणी लेणी खोदवून घेतली. सातवाहनांनंतर शिवनेरी किल्ला चालुक्य आणि राष्ट्रकूट या राजवटींच्या सत्तेखाली होता.Shivneri Fort Information In Marathi

        इ.स. ११७० ते १३०८ च्या सुमारास यादवांनी येथे आपले राज्य स्थापन केले आणि याच काळात शिवनेरी किल्ल्याला गडाचे स्वरूप प्राप्त झाले. इ.स. १४४३ मध्ये मलिक-उल-तुजार याने यादवांचा काळात सेवेत असलेल्या स्थानिक कोळी सरदारांचा पराभव करून किल्ला सर केला. अशा प्रकारे किल्ला बहमनी राजवटीखाली आला, नंतर इ.स. १४७० मध्ये मलिक-उल-तुजारचा प्रतिनिधी मलिक महंमद याने किल्ला नाकेबंद करून पुन्हा सर केला. इ.स. १४४६ मध्ये मलिक महंमदच्या वडिलांच्या मृत्यूनंतर निजामशाहीची स्थापना झाली. पुढे इ.स. १४९३ मध्ये इथली राजधानी गडावरून अहमदनगरला म्हणजेच आत्ताच्या आहिल्यानगरला हलवण्यात आली. इ.स. १५६५ मध्ये सुलतान मूर्तिजा निजामाने आपला भाऊ कासीम याला या गडावर कैदेत ठेवले होते. यानंतर इ.स. १५९५ मध्ये शिवनेरी किल्ला व जुन्नर प्रांत मालोजी राजे भोसले यांच्याकडे आला. Shivneri Fort Information In Marathi

      मोगल, निजामशाही , आदिलशाही यांच्या मध्ये चाललेल्या लढायांच्या धामधुमीत असलेल्या शहाजी राजांनी गरोदर असलेल्या जिजाबाईंना सुरक्षित ठेवण्यासाठी जुन्नर मावळातल्या शिवनेरी किल्ल्याची निवड केली. किल्ल्याच्या डोंगराला असलेले ताशीव कडे, भक्कम तटबंदी , बलाढ्य बुरुज आणि किल्ल्याला असणार्‍या सात प्रवशेव्दारांचे संरक्षण यामुळे किल्ला सुरक्षित होता. जिजाबाईंसोबत सोबत ५०० स्वार देऊन शहाजी राजांनी त्यांना शिवनेरीवर पाठवले. त्यावेळी शिवनेरी गडाचे गडकरी विजयराव सिधोजी विश्वासराव हे शहाजी राजांच्या नात्यातले होते. गडाची अधिष्ठात्री श्री भवानीमाता शिवाई देवीला जिजाऊने मनोमन नवस केला “आपल्याला पुत्र झाला तर तुझें नांव ठेवीन “

      शके १५५१ शुक्ल नाम संवत्सरे,उत्तरायणातं, फाल्गुन वद्य तृतीयेला, शिशिर ऋतूत , हस्त नक्षत्रावर, सिंह लग्नावर शुक्रवारी सूर्यास्तानंतर शिवाजीराजे यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. तारीख होती १९ फेब्रुवारी, इसवी सन १६३०. इ.स. १६३२ मध्ये जिजाबाईने शिवाजीराजेसह गड सोडला आणि १६३७ मध्ये किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला.Shivneri Fort Information In Marathi

     सन १६३२मध्ये किल्ल्याचे किल्लेदार सिधोजी विश्वासराव होते. त्यांच्या कन्येचा विवाह शहाजी पुत्र संभाजी राजे यांचाशी झाला होता. जुन्नर रणसंग्रामात शहाजीपुत्र थोरले संभाजी राजे यांनी पराक्रम केला होता. शायिस्ताखानाने जुन्नर जिकलं पण संभाजी राजांच्या अतुलनीय पराक्रमामुळे शिवनेरी जिंकता आले नाही. त्यामुळे जुन्नर मोघलाईत तर शिवनेरी निजामशाहीत अशी परिस्थिती झाली होती. सन १६५० मध्ये मोगलांविरूद्ध येथील महादेव कोळ्यांनी बंड केले. यांचे नेतृत्व सरनाईक आणि किल्ल्याचे किल्लेदार खेमाजी रघतवान यांनी केले. काही महादेव कोळी लोकांनी मोगलांविरुद्ध युद्ध  करून जुन्नर व शिवनेरी किल्ल्याचा ताबा घेतला. ही गोष्ट मोगल बादशहाला कळताच त्याने एक मोठी फौज पाठवली. त्या मोगल फौजेने शिवनेरी किल्ल्याला वेढा घातला व लवकरच महादेव कोळ्यांच्या सैन्यांनी बलाढ्य मोगल सैन्यापुढे शरणागती पत्करली,

सुमारे 1500 महादेव कोळ्यांना कैद करण्यात आले व त्यांचे हाल करून नंतर त्यांचे शिरच्छेद करण्यात आले. हजारो मुडक्यांचा ढीग करून त्यावर एक चबुतरा बांधला. यांचे नेतृत्व सरनाईक आणि किल्ल्याचे किल्लेदार खेमाजी रघतवान यांनी केले.ह्या नरसंहाराची आठवण म्हणून आज त्या चौथऱ्याला कोळी चौथरा म्हणतात. नंतर त्या चौथऱ्यावर एक घुमटी बांधली गेली व त्यावर पारसीमधे दोन शिलालेखदेखील आहेत. यात मोगलांचा विजय झाला आणि  पुढे इ.स. १६७३मध्ये शिवनेरीचा किल्लेदार अजीजखान याला फितवून किल्ल्याला माळ लावून सर करण्याचा अयशस्वी प्रयत्‍न शिवाजी राजांनी केला. Shivneri Fort Information In Marathi

       शिवरायांच्या उत्तरेकडील मोहिमेवेळी पेशवे मोरोपंत पिंगळे यांनी शिवनेरी घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश नाही आलं . इ.स. १६७८ मध्ये जुन्नर प्रांत लुटला गेला आणि मराठ्यांनी किल्ला घेण्याचा परत एकदा प्रयत्‍न केला, मात्र अपयश पदरात पडले. पुढे ३८ वर्षांनंतर १७१६ मध्ये शाहूमहाराजांनी किल्ला मराठेशाहीत आणला व नंतर तो पेशव्यांकडे देण्यात आला. इ.स. १७५५ च्या पेशवे-आंग्रे युद्धानंतर नाना साहेब पेशव्यांनी तुळाजीला शिवनेरीवर कैदेत ठेवले होते. तुळाजींनी सुटकेसाठी स्थानिक कोळी सरदारांची मदत घेतली होती. त्यामुळे नानासाहेबांनी चिडून जाऊन कोळी सरदारांची वतने, जमिनी, जहागीरदारी जप्त केल्या अशी पेशवे दप्तरात नोंद आहे.Shivneri Fort Information In Marathi

      इ.स. १७६४मध्ये माधवराव पेशवे यांनी प्रशासनात केलेल्या बदलाची परिणती, शिवनेरी आणि पुरंदर किल्ल्याच्या कोळ्यांनी केलेल्या बंडात झाली. शिवनेरीवरील कोळ्यांना रामचंद्र शिवाजी माने याने कामावरून काढले होते. रामचंद्र माने याने १५ सप्टेंबर १७६४ रोजी शनिवारवाड्यावर राघोबादादा यांस बंड मोडून काढणे अवघड जात असल्याबद्दलची माहिती पत्राद्वारे कळवली होती. महादेव कोळी समाज एकत्रित जमाव करून अचानक हल्ला करतात अश्याच प्रकारे गनिमी काव्याप्रमाणे त्यानी जीवधन, चावंड, हडसर यासारख्या किल्लांचा ताबा घेतला होता. नंतर पुढे शिवनेरीवरील उधो विश्वेश्वराचे धोरणांना विरोध करण्यासाठी बंड केले.Shivneri Fort Information In Marathi

     सन १७६५मध्ये महादेव कोळ्यांनी दुसरे बंड केले. या बंडाचे नेतृत्व जुन्नरच्या मावळतील देशमुख/नाईक संताजी शेळकंदे यांनी केले. यामध्ये त्यांनी शिवनेरीचा ताबा घेतला. हे बंड मोडून काढण्यासाठी पुण्याहून बारभाईंनी आणि सवाई माधवरावांनी उधो विश्वेश्वरच्या मदतीला गारद्यांना पाठवले. पुढे बंड मोडून काढले आणि महादेव कोळी सरदारांना शिक्षा करण्यात आली. संताजी मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले. वारंवार होणाऱ्या बंडामुळे पेशवे हैराण झाले. पुढे सन १७७१मध्ये नाना फडणीसांनी संताजी बरोबर तह केला आणि त्यांना सरदारकी बहाल केली आणि शिवनेरीवर पुन्हा कोळ्यांना सेवेत रुजू केले.Shivneri Fort Information In Marathi

     पेशवे काळात शिवनेरीचा उपयोग कैद्यांसाठी केला जात होता. शिवनेरी किल्ल्यावरील कैद्यांना काही आनंदाच्या प्रसंगी सोडूनदेखील देण्यात येत होते. १८ एप्रिल १७७४ रोजी सवाई माधवराव यांचा जन्म झाला. या आनंदाप्रीत्यार्थ बारभाई मंडळाने शिवनेरी आणि नारायणगड यांवरील कैद्यांना सोडून देण्यात आले होते, अशी नोंद आहे. काळाच्या ओघात शिवनेरीवरील कैदखानाची पडझड होऊन गेली शिवनेरी किल्ल्याची माहिती मराठीत.Shivneri Fort Information In Marathi

      सन १० मे १८१८ मध्ये मेजर एल्ड्रिजनने शिवनेरी किल्ल्याला वेढा घातला. किल्लेदाराने काही काळ किल्ला लढवला. नंतर त्याने किल्ला सोडून हडसरच्या किल्ल्याचा किल्लेदाराकडे आश्रय घेतला अशी इतिहासात नोंद आहे.Shivneri Fort Information In Marathi

महादेव कोळी चौथरा :-

      शिवाजी महाराजांच्या पुणे परिसरातील कारवाया आदिलशाहीला खुपत होत्या. मोगलांना जरी त्या ठाऊक असल्या तरी अजून त्यांना त्याचा थेट उपसर्ग होत नव्हता. त्याच सुमाराला काही महादेव कोळी लोकांनी मोगलांविरुद्ध आघाडी उघडून जुन्नर व शिवनेरीचा ताबा घेतला. ह्यापूर्वी हा भाग निजामशाहीकडे होता. निजामशाही पडल्यानंतर सीमाभागाकडे आदिलशाहीचे व मोगलांचे थोडे दुर्लक्ष होत होते. कदाचित ह्याचा फायदा घेऊन ह्या महादेव कोळ्यांनी त्या प्रांतावर अधिकार स्थापित केला असावा. मोगलांनी ह्यावर लगेच उपाययोजना करण्यासाठी व महादेव कोळ्यांना परास्त करण्यासाठी एक भली मोठी फौज पाठवली. शिवनेरीला वेढा पडला व लवकरच महादेव कोळ्यांच्या नवख्या सैन्याने बलाढ्य मोगल सैन्यापुढे शरणागती पत्करली .

सुमारे १५०० महादेव कोळ्यांना जेरबंद करण्यात आले. त्यांचे अतोनात हाल करून नंतर माथ्यावरच्या एका चौथऱ्यावर त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. ह्या नरसंहाराची आठवण म्हणून आज त्या चौथऱ्याला कोळी चौथरा म्हणतात. नंतर त्या चौथऱ्यावर एक घुमटी बांधली गेली व त्यावर पारसीमधे दोन शिलालेखदेखील आहेत. या उठावाचे नेतृत्व सरनाईक व किल्ल्याचे किल्लेदार खेमाजी रघतवान यांनी केले.यात सरनाईकाच्या कुटूंबाला,नातेवाईकांना तसेच 52 मावळातील देशमुख/नाईकांना यांची धरपकड करून शिरछेद करण्यात आला. यात लहान मुले तसेच स्त्रियांचा देखील समावेश होता. आपली दहशत बसावी म्हणून तसेच पुन्हा उठाव होऊ नये म्हणून मोघलांनी असे भयानक दुष्कृत्य केले.Shivneri Fort Information In Marathi

शिवनेरी किल्ल्या  वरील पहाण्यासारखी ठिकाणे :

पायरी मार्ग : सुस्तीत असलेल्या पायरी मार्ग गडावर जाण्या साठी खूप सोपा मार्ग आहे.  या मार्गाने गडावर जाण्यासाठी एका पाठोपाठ एक अशे आपल्या ला 7 दरवाजे लागतात.

पहिला दरवाजा  : या दरवाज्याला महादरवाजा असे म्हंटले जाते, हा दरवाजा खूप चांगल्या आवस्तेथ आल्याला पाहावयास मिळतो.

दुसरा दरवाजा : या दरवाज्याला गणेश  दरवाज्या असे म्हंटले जाते. हा ही दरवाजा खूप चांगल्या आवस्तेथ आल्याला पाहावयास मिळतो.

तिसरा दरवाजा : या दरवाज्याला परवानगी दरवाजा आस म्हणता , पण या दरवाज्याची कमान पूर्ण पणे ढासळेली आहे. या दरवाजा वरती आपल्याला शरभा ची शिल्प पाहायला मीळतात. एका बाजूचे शिल्प पूर्णपणे पडलेलं आहे.

चौथा दरवाजा : हा दरवाजा खूप सुंदर व अप्रतिम आहे . या दरवाज्याला पीर दरवाजा असे म्हंटले जाते.

पाचवा दरवाजा :  या दरवाजाला हत्त्ती दरवाजा असे म्हंटले जाते , हा दरवाजा किल्ल्या वर येणाऱ्या शत्रूला सहज सहजे दिसत नाही कारण , त्या दरवाज्या कडे जाणारा रास्ता हा

हत्तीच्या सोंडे प्रमाणे नागमोडी म्हणजेच वळणदार आकारात आहे , म्हणून कदाचीत या दरवाज्याला हत्ती दरवाजा म्हणतात. खूप मोठा आणि आवस्तेथ आल्याला हा दरवाजा पाहावयास मिळतो. दरवाज्याच्या आतील बाजूस आपल्या ला दोनही बाजूस पहारे करुंच्या देवळ्या आपल्याला पाहायला मिळतात. पहारे करुंच्या विश्रांती साठी छोट्या खोल्या असतात त्यालाच देवळ्या असे म्हंटले जाते .

थोडे पुढे जाताच आपल्याला दोन मार्ग लागतात , एक मार्ग किल्ल्या वर जातो तर दुसरा मार्ग शिवाई देवी मंदिरा कडे जातो.Shivneri Fort Information In Marathi

शिवाई देवी मंदिर : असे म्हंटले जाते कि शिवाई देवीच्या नावावरून आईसाहेब जुजाऊ यांनी शिवाजी महाराज यांचे नाव ठेवले होते.  मंदिर खूप चांगल्या आवस्तेथ आहे.

शिवाई देवी दरवाजा : खूप सुंदर आसा हा दरवाजा आहे, त्या वर चार स्तंभ देखील कोरलेले आपल्याला दिसतात.

सहावा दरवाजा : या दरवाज्याला मेणा  दरवाजा असे म्हंटले जाते.

सातवा दरवाजा : या दरवाज्याला कुलूप दरवाजा असे म्हंटले जाते. हा किल्ल्या चा शेवटचा दरवाजा असून आती भकंम आसा हा दरवाजा आहे . दरवाज्याच्या वरती दोन  शरभाची  शिल्प आहेत. हे शिल्प म्हणजे शक्ती आणि सामर्थ याचा प्रतीक आहे.

अंबारखाना : धान्य साठवण्या साठी याचा उपयोग होत आसात. खूप मोठं असं बांधकाम आहे.

सरकार वाडे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थाना समोरच काही  पडक्या आवस्तेथ असल्याले वाड्यांचे अवशेष पाहायला मेळतात त्यांनाच पूर्वीच्या काळी सरकार वाडे म्हणत.

छत्रपती शिवाजी महाराज जन्म स्थान : या पवित्र वस्तू मधी आपल्या ला शिवाजी महाराजांचा पाळणा आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते.  याचा वस्तूच्या वरच्या खोली मधून आपल्याला संपूर्ण जुन्नर शहर दिसते. छत्रपती शिवाजी महाराज याचा जन्म इथेच झाला होता.Shivneri Fort Information In Marathi

स्मारक : आईसाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा लहान पणचा पुतुल.

कडेलोट टोक : स्वराजायच्या विरोधात कोण गद्दार पण करत असत त्याला इथून कडेलोट केला जात असत.

गडावर जाण्याचे मार्ग:-

गडावर जाण्याचे दोन प्रमुख मार्ग जुन्नर गावातूनच जातात. पुणेकरांना तसेच मुंबईकरांना एका दिवसात शिवनेरी पाहून घरी परतता येते.Shivneri Fort Information In Marathi

१) साखळीची वाट :-

या वाटेने गडावर यायचे झाल्यास जुन्नर शहरात शिरल्यानंतर नव्या बसस्टँड समोरील रस्त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ यावे. येथे चार रस्ते एकत्र मिळतात.डाव्या बाजूस जाणार्‍या रस्त्याने साधारणत: एक किलोमीटर गेल्यावर रस्त्याच्या उजव्या कडेला एक मंदिर लागते. मंदिरासमोरून जाणारी मळलेली पायवाट थेट शिवनेरी किल्ल्याच्या एका कातळभिंतीपाशी घेऊन जाते. भिंतीला लावलेल्या साखळीच्या साह्याने आणि कातळात खोदलेल्या पायर्‍यांच्या साह्याने किल्ल्यावर पोहोचता येते. ही वाट थोडी अवघड असून गडावर पोहोचण्यास पाऊण तास लागतो.Shivneri Fort Information In Marathi

२) सात दरवाज्यांची वाट :-

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून डाव्या बाजूच्या रस्त्याने चालत जाताना डांबरी रस्ता आपणास गडाच्या पायर्‍यांपाशी घेऊन जातो. या वाटेने गडावर येतांना सात दरवाजे लागतात. पहिला महादरवाजा, दुसरा पीर दरवाजा, तिसरा परवानगीचा दरवाजा, चौथा हत्ती दरवाजा, पाचवा शिपाई दरवाजा, सहावा फाटक दरवाजा आणि सातवा कुलाबकर दरवाजा. या मार्गे किल्ल्यावर पोहोचण्यासाठी दीड तास लागतो.Shivneri Fort Information In Marathi

३) मुंबईहून माळशेज मार्गे :-

जुन्नरला येतांना माळशेज घाट पार केल्यावर ८ ते ९ किलोमीटरवर ‘शिवनेरी १९ किमी’ अशी एक पाटी रस्त्याच्या कडेला लावलेली दिसते. हा मार्ग गणेश खिंडीतून शिवनेरी किल्ल्यापर्यंत जातो. या मार्गाने गडावर पोहोचण्यास एक तास लागतो. Shivneri Fort Information In Marathi

४) पुणेहून नारायणगाव मार्गेः

पुणे मधून नारायणगाव पर्यंत साधारणतः 75 कि.मी. अंतरावर पुणे-नाशिक मार्गे व त्यानंतर नारायणगाव-जुन्नर मार्गे 15 कि.मी. Shivneri Fort Information In Marathi

छायाचित्र :-

FAQs

1. शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला?
१९ फेब्रुवारी १६३० ला शिवाजी महाराजांचा जन्म झाला.

2.शिवनेरी किल्ल्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे?
शिवनेरी किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एक महत्वाचा किल्ला आहे. हा किल्ला शिवाजी महाराजांचा जन्मस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. शिवनेरी किल्ला शिवाजी महाराजांच्या बालपणीच्या काळात त्यांच्या राजकीय व युद्ध कौशल.घोडेस्वारी, तिरंदाजी,न्यायनिवाडा, विकासात महत्त्वाची भूमिका बजावला.

3.शिवनेरी किल्ला कोणत्या शतकात बांधला गेला?
सतवाहन युगात, म्हणजेच ई.स.पू. १७ व्या शतकात बांधला गेला असावा आशि मान्यता आहे.

4.शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला?
शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यात झाला, जे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात आहे.

5.शिवाजी महाराजांच्या आठ पत्नी कोण आहेत?
छत्रपती शिवाजी महाराजांना आठ बायका आहेत हे अनेकांना माहीत नाही. त्यांची पहिली पत्नी सईबाई होती, ज्यांना निंबाळकर असेही म्हणतात. सोयराबाई, मोहिते, पुतळाबाई, पालकर, साकवरबी गायकवाड, सांगुणाबाई आणि काशीबाई जाधव ही इतर पत्नींची नावे होती. त्यांची पहिली पत्नी सईबाई हिने त्यांना संभाजी आणि तीन मुली झाल्या.